शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

‘पीएम किसान’मधील अडसर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये हे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, तालुक्यातून आलेल्या अनेक अर्जांमध्ये एखाद्या किरकोळ त्रुटीसाठी शेतकऱ्यांना वर्षभरापासून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत तसेच योजनेच्या आर्थिक लाभापासुनही दूर रहावे लागत आहे.

ठळक मुद्दे‘ऑन दी स्पॉट’ : तीन हजार शेतकरी ठरणार लाभार्थी, त्रुटीत अडकले होते अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून तालुक्यातील अनेक शेतकरी ऑनलाईन अर्जातील क्षुल्लक त्रुटींमुळे वंचित होते. अर्जातील त्रुटी त्वरित दूर करण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन केले होते. यामधून ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी ‘ऑन दी स्पॉट’ दूर करण्यात आल्या.केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये हे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, तालुक्यातून आलेल्या अनेक अर्जांमध्ये एखाद्या किरकोळ त्रुटीसाठी शेतकऱ्यांना वर्षभरापासून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत तसेच योजनेच्या आर्थिक लाभापासुनही दूर रहावे लागत आहे. ही बाब लक्षात येताच तहसीलदार अभिजित जगताप यांनी शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी तातडीने दूर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तालुक्यातील सात महसूल मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.२९ जून ते ४ जुलै या दरम्यान ही शिबिरे घेण्यात आली. शिबिरांमध्ये सात मंडळांतील ३०२० शेतकºयांच्या पीएम किसानच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यात आल्या. आता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.५२ हजार खातेदार २८ हजार नोंदणीतालुक्यात एकूण ५२ हजार ६२ खातेदार आहेत. अद्याप २८ हजार ४३५ पात्र लाभार्थींनी नोंदणी केली आहे. यादरम्यान करजगाव मंडळात ६३५, शिरजगाव कसबा येथे १९०, ब्राम्हणवाडा थडी येथे ५३०, बेलोरा येथे ३५०, चांदुर बाजार मंडळात ५९०, तळेगाव मोहना मंडळात ३९०, आसेगाव मंडळात ३३५ अशा एकूण ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर सारण्यात आल्या.पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकºयाला मिळावा, यासाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन केले होते. याामध्ये ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या. आता त्यांना योजनेचा लाभ मिळेल.अभिजित जगतापतहसीलदार, चांदूर बाजार

टॅग्स :agricultureशेती