शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

समूह कर्जप्रकरणातील अन्याय दूर करा

By admin | Updated: July 21, 2015 00:13 IST

सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगात योजनेअंतर्गत बचत गटाचे समूह कर्ज प्रकरणातील अन्याय दूर करावा या ...

अंजनगावचे महिला बचत गट आक्रमक : जिल्हा परिषद सीईओंसमोर मांडल्या समस्या अमरावती : सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगात योजनेअंतर्गत बचत गटाचे समूह कर्ज प्रकरणातील अन्याय दूर करावा या मागणीसाठी सोमवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील महिला बचत गटांनी प्रहारच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत धडक दिली. यावेळी सीईओ सुनील पाटील यांच्यासमोर अडचणी मांडून यावर तोडगा काढण्याची मागणी केली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटांना सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजनेअंतर्गत विविध उद्योगासाठी समूह कर्जाचा पुरवठा केला जातो. सन १०१०/११ आणि ११/१२ मध्ये या बचत गटांना सुमारे २५ हजार ते २ लाख ५० हजार रूपयापर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी काही बचत गटांनी नियमित कर्जाची परत फेडही केली आहे. मात्र त्यांना या कर्जावर मिळणारी अनुदानाची रक्कम मिळाली नाही.यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ११ बचत गट नवीन कर्जापासून वंचित आहेत. याबाबत प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांनी पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि संबंधित बँकांकडे लेखी पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने दखल घेतली नसल्याने २० जुलै रोजी शिदोरी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार तालुक्यातील माता जिजाऊ, श्री लक्ष्मी, एकता, जय दुर्गा, गायत्री, त्रिरत्न, साईबाबा, प्रियदर्शनी मयावती, आदिवासी, मुक्ताई आदी बचत गट प्रशासनाच्या समन्वयाअभावी अनुदानापासून वंचित राहिले. परिणामी या बचत गटांना शासनाचे अनुदान मिळू शकले नाही. अखेर या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी लिड बँकेचे व्यवस्थापक अनंत खोरगडे, व एस बी.आयचे मुख्य व्यवस्थापक एस. के.सिंग यांना बोलावून या मुद्दावर चर्चा केली. यावेळी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. ज्या बचत गटांनी कर्जाचा रितसर भरणा केला अशा व नव्याने मंजूर कर्जाचा पुरवठा त्वरित करण्याची सूचना बँक अधिकाऱ्यांना केली आहे. मंजूर कर्जाची रक्कम परिपूर्ण बँकेने दिली नाही. याबाबत विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश डीआरडीएला दिले. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, जोगेंद्र मोहोड, पं.स.सदस्य प्रदीप निमकाळे, अवि टाक, सनि शळके, राजू पडोळे व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)महिला बचत गटातील कर्ज प्रकरणाचा आढावा मंगळवारी होणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याच्या बैठकीत घेतला जाईल आणि सर्व बचत गटातील अर्ज, वसुली आणि वाटप याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल - सुनील पाटील,सीईओ, जिल्हा परिषद.