शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जीविताचे बरे-वाईट झाल्यास याद राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:48 IST

पुनर्वसित आठही गावांत आदिवासींचे आंदोलन सुरूच आहे. एकही आदिवासी जंगलाबाहेर निघाला नाही, सत्ताधाऱ्यांचे थापा मारणे बंद करून त्यांच्या हातात सातबारा द्या आणि तेथे घर बांधून द्या,...

ठळक मुद्देबबलू देशमुख : जिल्ह्यातील काँग्रेसजन आदिवासींच्या भेटीला

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : पुनर्वसित आठही गावांत आदिवासींचे आंदोलन सुरूच आहे. एकही आदिवासी जंगलाबाहेर निघाला नाही, सत्ताधाऱ्यांचे थापा मारणे बंद करून त्यांच्या हातात सातबारा द्या आणि तेथे घर बांधून द्या, त्यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले तर शासन-प्रशासनाला सोडणार नाही. काँग्रेस आंदोलकांसोबत असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.शनिवारी चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा बु., अमोना, गुल्लरघाट, केलपाणी, बारूखेडा, नागरतास, सोमठाना खुर्द आदी आठही गावात जाऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार केवलराम काळे, जि. प. सदस्य वासंती मंगरोळे, दयाराम काळे, कैलास आवारे, व ३० आदिवासी पदाधिकाऱ्यांनी पुनर्वसित आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे सांगून आदिवासींना दिला. शनिवारी दुपारी चार वाजता पुनर्वसितांशी चर्चा करीत त्यांना आरोग्यासह मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी शासन-प्रशासनाची आहे. त्यांचे वाहन आतमध्ये नेऊ दिल्या जात नाही, बोअरवेलला सील लावून ठेवले आहे, उघड्यावर त्यांचा संसाराचा गाडा सुरू आहे. अशात शासन आणि प्रशासन केवळ गप्पा हाकून त्यांना आश्वासनाचे गाजर देत असल्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे. जंगलात हिंस्त्र प्राण्यांपासून आदिवासींच्या जिविताला धोका आहे. त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास शासन-प्रशासन त्याला सर्वस्वी जबाबदार राहणार असून काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे. कुणालाच यात सोडणार नसल्याचा गंभीर इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला.तीन बिबट्यांचे दर्शनमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित परिसरातील जंगलात आदिवासींचे आपल्या मूळ गावी आंदोलन सुरू असताना त्यांची विचारपूस आणि भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसजनांना रस्त्याने येताना तीन बिबट्याने दर्शन दिल्याचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.सातबारा आणा तेव्हा बघू२५ डिसेंबर रोजी आपल्या मूळगावी परतलेले आदिवासी मागील २२ दिवसांपासून आंदोलन करीत आहे. त्यांच्या पालीच्या झोपडीत एक महात्मा गांधींचा फोटो लावला असून कुठल्याच प्रकारचे उग्र आंदोलन न करता गांधीगिरीचा अंत पाहू नका, सातबारा आणा शेतात घर बांधून द्या मगच येथून उठू अन्यथा येथेच अखेरचा श्वास घेण्याचा गर्भीत इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.