शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून दिलासा

By admin | Updated: February 12, 2017 00:12 IST

मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या.

यंदा १७ प्रकरणे : २०१६ च्या जानेवारीत ३९ आत्महत्याअमरावती : मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. तसेच जानेवारी महिन्यात ३९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यंदा मात्र या दुर्दैवी दुष्टचक्रातून जिल्ह्याला थोडा दिलासा मिळाला. यंदाच्या जानेवारीत शेतकरी आत्महत्येचे १७ प्रकरणे घडली. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नये, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा अश्या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार ३१ जानेवारी २०१७ अखेर जिल्ह्यात ३०७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १२२१ प्रकरणे मदतीसाठी पात्र, १८१९ अपात्र व ३१ प्रकरणे चौकसीसाठी प्रलंबित आहेत. सततचा दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे नैराश्य येऊन जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबावे यासाठी शासनाने राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी विविध योजना शासनाने राबविल्या. प्रत्यक्षात खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची पुनर्रचना केली. मात्र मिशन देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यास अपयशी ठरल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. मागील वर्षी ३४८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर ३० तासात एका शेतकऱ्याची आत्महत्या असे जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र होते. किंबहुना गतवर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. सलगचा दुष्काळ व नापिकी हे आत्महत्यांमागे प्रमुख घटक होते. मात्र यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने खरिपाला साथ दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टचक्रात जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात गतवर्षी जिल्ह्यात ३४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद व्हायची. ती ओळख पुसली गेली व सन २०१६ मध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, अशी नोंद झाली आहे. यंदा मात्र जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्यांची कमी झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला.