शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून दिलासा

By admin | Updated: February 12, 2017 00:12 IST

मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या.

यंदा १७ प्रकरणे : २०१६ च्या जानेवारीत ३९ आत्महत्याअमरावती : मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. तसेच जानेवारी महिन्यात ३९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यंदा मात्र या दुर्दैवी दुष्टचक्रातून जिल्ह्याला थोडा दिलासा मिळाला. यंदाच्या जानेवारीत शेतकरी आत्महत्येचे १७ प्रकरणे घडली. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नये, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा अश्या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार ३१ जानेवारी २०१७ अखेर जिल्ह्यात ३०७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १२२१ प्रकरणे मदतीसाठी पात्र, १८१९ अपात्र व ३१ प्रकरणे चौकसीसाठी प्रलंबित आहेत. सततचा दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे नैराश्य येऊन जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबावे यासाठी शासनाने राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी विविध योजना शासनाने राबविल्या. प्रत्यक्षात खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची पुनर्रचना केली. मात्र मिशन देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यास अपयशी ठरल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. मागील वर्षी ३४८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर ३० तासात एका शेतकऱ्याची आत्महत्या असे जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र होते. किंबहुना गतवर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. सलगचा दुष्काळ व नापिकी हे आत्महत्यांमागे प्रमुख घटक होते. मात्र यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने खरिपाला साथ दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टचक्रात जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात गतवर्षी जिल्ह्यात ३४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद व्हायची. ती ओळख पुसली गेली व सन २०१६ मध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, अशी नोंद झाली आहे. यंदा मात्र जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्यांची कमी झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला.