शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्यांमध्ये दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

गजानन मोहोड अमरावती : राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा अशी बोचरी असणारी अमरावती जिल्ह्याची ओळख यंदा काहीअंशी कमी झालेली ...

गजानन मोहोड

अमरावती : राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा अशी बोचरी असणारी अमरावती जिल्ह्याची ओळख यंदा काहीअंशी कमी झालेली आहे. गतवर्षी मेअखेरपर्यत १०८ शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या. त्यातुलनेत यंदा ७८ प्रकरणे घडली आहेत. कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्या घटल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.

अस्मानी अन् सुलतानी संकटांमुळे सन २०२० मध्ये २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास गळ्याला बांधला. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, यातून वाढलेले बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज व कर्जवसुलीचा तगादा, याशिवाय मुलामुलींचे शिक्षण, लग्न या विवंचनेत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. जगावं कसं, या मानसिकतेतून धीर खचून शेतकरी आत्महत्या करीत असल्याची शोकांतीका आहे.

शासनाने शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांसाठी अनेक योजना दिल्या. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचतच नाही. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ कधीच जुळत नाही. डोईवरचा कर्जाचा भार दरवर्षी वाढताच असतो. शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी असणाऱ्या जिल्हा समितीची बैठक चार-चार महिने होत नाही. केवळ शासनच नव्हे तर प्रशासनदेखील या संवेदनशील विषयावर गंभीर नाही. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. शासनाने कर्जमाफी केली असली तरी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.

पाईंटर

शेतकरी आत्महत्यांची स्थिती

महिना २०२० २०२१

जानेवारी २४ २०

फेब्रुवारी २७ ११

मार्च १४ २०

एप्रिल १३ १४

मे २९ ०८

बॉक्स

४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित

जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्यांची ७३ प्रकरणे घडली. यामध्ये चार प्रकरणे नामंजूर करण्यात आली. २१ प्रकरणे पात्र ठरवून मृतांच्या वारसाला एक लाखाची शासकीय मदत देण्यात आली. याशिवाय ४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या मृत्यूपश्चात लालफीतशाहीचा ससेमिरा त्यांच्या वारसाच्या मागे लागला आहे.

बॉक्स

२० वर्षांत ४,२९६ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा घोट

जिल्ह्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४,२९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी १,९५९ प्रकरणे पात्र ठरली आहेत. त्यापेक्षा जास्त २,२६५ प्रकरणे अपात्र ठरविली गेली. याशिवाय ७२३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे अद्याप चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

कोट

०००