शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्यांमध्ये दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

गजानन मोहोड अमरावती : राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा अशी बोचरी असणारी अमरावती जिल्ह्याची ओळख यंदा काहीअंशी कमी झालेली ...

गजानन मोहोड

अमरावती : राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा अशी बोचरी असणारी अमरावती जिल्ह्याची ओळख यंदा काहीअंशी कमी झालेली आहे. गतवर्षी मेअखेरपर्यत १०८ शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या. त्यातुलनेत यंदा ७८ प्रकरणे घडली आहेत. कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्या घटल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.

अस्मानी अन् सुलतानी संकटांमुळे सन २०२० मध्ये २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास गळ्याला बांधला. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, यातून वाढलेले बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज व कर्जवसुलीचा तगादा, याशिवाय मुलामुलींचे शिक्षण, लग्न या विवंचनेत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. जगावं कसं, या मानसिकतेतून धीर खचून शेतकरी आत्महत्या करीत असल्याची शोकांतीका आहे.

शासनाने शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांसाठी अनेक योजना दिल्या. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचतच नाही. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ कधीच जुळत नाही. डोईवरचा कर्जाचा भार दरवर्षी वाढताच असतो. शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी असणाऱ्या जिल्हा समितीची बैठक चार-चार महिने होत नाही. केवळ शासनच नव्हे तर प्रशासनदेखील या संवेदनशील विषयावर गंभीर नाही. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. शासनाने कर्जमाफी केली असली तरी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.

पाईंटर

शेतकरी आत्महत्यांची स्थिती

महिना २०२० २०२१

जानेवारी २४ २०

फेब्रुवारी २७ ११

मार्च १४ २०

एप्रिल १३ १४

मे २९ ०८

बॉक्स

४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित

जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्यांची ७३ प्रकरणे घडली. यामध्ये चार प्रकरणे नामंजूर करण्यात आली. २१ प्रकरणे पात्र ठरवून मृतांच्या वारसाला एक लाखाची शासकीय मदत देण्यात आली. याशिवाय ४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या मृत्यूपश्चात लालफीतशाहीचा ससेमिरा त्यांच्या वारसाच्या मागे लागला आहे.

बॉक्स

२० वर्षांत ४,२९६ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा घोट

जिल्ह्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४,२९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी १,९५९ प्रकरणे पात्र ठरली आहेत. त्यापेक्षा जास्त २,२६५ प्रकरणे अपात्र ठरविली गेली. याशिवाय ७२३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे अद्याप चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

कोट

०००