शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

शहरातील काही नाकाबंदी पाॅइंटवर शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : शासन व प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान लॉकडाऊन लावीत कडक निर्बंध घातले आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर थेट ...

अमरावती : शासन व प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान लॉकडाऊन लावीत कडक निर्बंध घातले आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर थेट गुन्हा नोंदविला जात आहे. मात्र, शहरातील मुख्य चौक जर सोडले तर हद्दीतील काही नाकाबंदी पाॅइंटवर शिथिलता दिली जात असल्याचे चित्र आहे. विनाकारण फिरणाऱ्याला हटकले नाही त्याच्यावर कारवाई केली जात नसेल कसे रोखणार कोरोनाला असा सावल केला जात आहे.

पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ४५ ठिकाणी फिक्स पॉइंट तर सात ठिकाणी शहर हद्दीत येणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी नाकाबंदी पॉइंट लावले आहे. मात्र, सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वलगाव येथील परतवाडा- दर्यापूर मार्गावरील नाकाबंदी पॉइंटवर पोलीस होते मात्र फारसे वाहन चालकांना हटकले नाही. तसेच वलगाव ठाण्यासमोर पोलीसच नव्हते, तसेच चांगापूरजवळ एक वाहतूक पोलीस कार्यरत होते मात्र कुणालाही चेक केले जात नव्हते. मात्र कठोरा नाका पाॅईंट, शेगाव नाका, पंचवटी चौक तसेच इर्विन चौकातील वाहतूक शाखा पॉईंट, राजकमल चौक, जयस्तंभ चौकावर कसून चौकशी करीत कारवाया करण्यात आल्या. दुपारी १२ नंतर ५ वाजेपर्यंत नाकाबंदी पाॅईंटवर ढिल दिल्या जात आहे. त्यादरम्यान शहरात अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहे. रात्री ९ वाजतानंतर सुद्धा पोलीस रिलॅक्स होतात. काही ठिकाण इव्हनिंग वाकला नागरिक जात आहेत. कारवाया वाढिवल्यास कोरोनाला थांबविणे शक्य होऊ शकते. तसेच प्रत्येक कॉलनीत पोलिसांनी एकदा तरी गस्त घालावी.