शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

शहरातील काही नाकाबंदी पाॅइंटवर शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : शासन व प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान लॉकडाऊन लावीत कडक निर्बंध घातले आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर थेट ...

अमरावती : शासन व प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान लॉकडाऊन लावीत कडक निर्बंध घातले आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर थेट गुन्हा नोंदविला जात आहे. मात्र, शहरातील मुख्य चौक जर सोडले तर हद्दीतील काही नाकाबंदी पाॅइंटवर शिथिलता दिली जात असल्याचे चित्र आहे. विनाकारण फिरणाऱ्याला हटकले नाही त्याच्यावर कारवाई केली जात नसेल कसे रोखणार कोरोनाला असा सावल केला जात आहे.

पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ४५ ठिकाणी फिक्स पॉइंट तर सात ठिकाणी शहर हद्दीत येणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी नाकाबंदी पॉइंट लावले आहे. मात्र, सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वलगाव येथील परतवाडा- दर्यापूर मार्गावरील नाकाबंदी पॉइंटवर पोलीस होते मात्र फारसे वाहन चालकांना हटकले नाही. तसेच वलगाव ठाण्यासमोर पोलीसच नव्हते, तसेच चांगापूरजवळ एक वाहतूक पोलीस कार्यरत होते मात्र कुणालाही चेक केले जात नव्हते. मात्र कठोरा नाका पाॅईंट, शेगाव नाका, पंचवटी चौक तसेच इर्विन चौकातील वाहतूक शाखा पॉईंट, राजकमल चौक, जयस्तंभ चौकावर कसून चौकशी करीत कारवाया करण्यात आल्या. दुपारी १२ नंतर ५ वाजेपर्यंत नाकाबंदी पाॅईंटवर ढिल दिल्या जात आहे. त्यादरम्यान शहरात अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहे. रात्री ९ वाजतानंतर सुद्धा पोलीस रिलॅक्स होतात. काही ठिकाण इव्हनिंग वाकला नागरिक जात आहेत. कारवाया वाढिवल्यास कोरोनाला थांबविणे शक्य होऊ शकते. तसेच प्रत्येक कॉलनीत पोलिसांनी एकदा तरी गस्त घालावी.