शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

लढवय्या नेतृत्वाची पुन्हा सिद्धता!

By admin | Updated: September 7, 2015 23:59 IST

प्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे ...

गणेश देशमुख अमरावतीप्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे त्यांच्या लढवय्य नेतृत्त्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. तालुका पातळीवरील बाजार समिती निवडणुकीचे स्वरुप एरवी लहान असले तरी तिवस्यात मात्र ही निवडणूक दिग्गजांची होती. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, सीपीआय हे पक्ष एकवटले होते. प्रहार पक्षातून निष्कासित झालेले संजय देशमुख यांनी यशोमतींच्या पराजयासाठी जसे उत्साही प्रयत्न केलेत, यशोमतींचे जावई सत्यजित निंबाळकर हेही तसेच यशोमती विरोधकांचे ऊर्जास्त्रोत बनून तिवस्यात डेरेदाखल होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबलू देशमुख हे त्यांच्या अचलपूर या गृहतालुक्यातील निवडणुकीत व्यग्र होते. तथापि, यशोमतींना डावलण्याची कुठलीही संधी गमावणे त्यांच्या स्वयंसंहितेविरुद्ध असल्याने तिवसा तालुक्यात 'पंजा'वर 'बाण' मारून 'कमळ' फुलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केलेत. एका महिला नेतृत्त्वाविरुद्ध स्वकीय-परकियांनी अशी अभेद्य राजकीय भिंत उभारल्यावर तिची मजबुती लोकमनांवर बिंबविण्यासाठी दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तिवसा तालुक्यात प्रचाराला नेले गेले. त्या दोन्ही पालकमंत्र्यांचा प्रभाव किती, हा मुद्दा स्वतंत्रपणे चर्चिला जावा, असा असला तरी नामदारांच्या शासकीय, प्रशासकीय 'वजना'चा अन् लाल दिव्यांचा प्रभाव ग्रामीण मनांवर पाडण्यासाठीचाच तो सर्वोच्च प्रयत्न होता. बंजारा मते वळविण्यासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि मराठा मतांवर छाप पाडण्यासाठी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना तिवस्यातील निवडणुकीत प्रचाराचा आग्रह धरण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत पार पडलेल्या चार बाजार समिती निवडणुकांपैकी केवळ तिवसा या एकमेव तालुक्यात दोन पालकमंत्री प्रचारासाठी गेले. तथापि, यशोमतींची छबी या दोन्ही नामदारांच्या छबीपेक्षाही प्रभावी ठरली. काँग्रेस पक्षाच्या धाटनीत नेतृत्वगुणांना मजबुती मिळाली असतानाही यशोमती ठाकूर या आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी ठरवून त्यांच्याविरुद्ध एकी केली होती. भगवी लाट, विरोधकांची हातमिळवणी आणि रक्ताच्या नात्यांनी केलेला दगा या घटना अपयश खुणविणाऱ्याच होत्या. चित्र असे भेसूर असतानाही आत्मविश्वास ढळू न देता, आक्रमकतेला संयमाची जोड देऊन यशोमतींनी विरोधकांचा जो धुंव्वाधार सफाया केला. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही बघायला मिळाली. विरोधाची कारणे द्यायला यशोमतींच्या विरोधकांना जसे त्यावेळी तोंड नव्हते, तसेच यावेळीही ते नाही!