शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

जलसंपदाच्या ११ प्रकल्पांसाठी पुनर्वसन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:11 IST

जिल्ह्यात पाटबंधारे विभाग व जलसंपदा विभागाच्या अंतर्गत करण्यात येत असलेले अनेक प्रकल्प या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचे पुनर्वसन झाले नसल्याने ...

जिल्ह्यात ४० प्रकल्प : प्रशासनाचे अपयश, मागणीनुसार निधीची पूर्तता नाहीअमरावती : जिल्ह्यात पाटबंधारे विभाग व जलसंपदा विभागाच्या अंतर्गत करण्यात येत असलेले अनेक प्रकल्प या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचे पुनर्वसन झाले नसल्याने अनेक प्रकल्पांचे कामे रखडले आहे. तसेच या प्रकल्पांवर मागणीनुसार निधीचीही तरतूद शासनाने केली नाही. अमरावती जिल्ह्यात एकूण ४० प्रकल्पांचे कामे हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी ११ प्रकल्पांसाठी परिसरात गावांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याकरिता युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहे. पण पुनर्वसन करताना अनेक अडचणींनाही अधिकाऱ्यांना समोरे जावे लागत आहे. काही प्रकल्पासाठी जमिनी हस्तांतरित करण्यात येत आहे. पण या कामांवर उपलब्ध निधीच नसल्याने निधी अभावी काही गावांचे पुनर्वसनाचे काम रखडले असल्याची माहिती हाती आली आहे. बेंबळा प्रकल्पामधील एकलारा, झिबले, येरड, सावंगा व टिटवा या पाच गावांचे तर निम्नवर्धा प्रकल्पातील वरुड (बगाजी), येरली, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर बऱ्हाणपूर या ६ गावांचे तर चांदी प्रकल्पातील वडाळा, फत्तेपूर, महिमापूर या तीन गावांचे असे एकूण १४ गावांचे पुनर्वसनाची कामे शासकीय अहवालानुसार पूर्ण झालेली असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यम प्रकल्पांपैकी पंढरी मध्यम प्रकल्पातील मौजे खापरखेडा या गावांचे पुनर्वसन मौजे खराड येथे करण्यात येत असून नागरी सुविधांची कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे. वासनी बु। मध्यम प्रकल्पातील बोरगाव दोरी, पेठ बोरगाव तळणी या गावाचे पुनर्वसन मौजे खराड येथे करण्यात येत आहे. नागरी सुविधांची कामे झालेली आहेत. वासनी बु। मध्यम प्रकल्पातील बोरगाव दोरी बोरगाव पेठ, बोरगाव तळणी या गावांचे पुनर्वसन प्राथमिक अवस्थेत असल्याचा अहवाल जलसंपदा विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. तसेच पेढी बॅरेज प्रकल्पात रोहणखेडा-पर्वतापूर प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन ऐवजी एकमुकी मोबदला देण्याबाबतच्या निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समिती यांच्या अध्यक्षतेखाली सन २०१६ या वर्षात विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. गर्गा मध्यम प्रकल्पात संयुक्त मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे पुनर्वसन गावठाण्याकरिता जागेची निवड होऊ शकली नसल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. या प्रकल्पाच्या अंशत: बाधित गावाचे कलम १०८ अंतर्गत वाजवी नुकसान भरपाई (ऐच्छिक पुनर्वसन) प्रस्ताव १ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या अन्वये मान्यतेसाठी विभागीत आयुक्त कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात आला आहे. पण अद्याप यावर काहीही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)