शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

पूरग्रस्त भापकीचे पुनर्वसन रखडलेलेच!

By admin | Updated: January 17, 2015 22:51 IST

अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या ऐलतीरावर वसलेले वरुड तालुक्यातील भापकी हे ५०० लोकवस्तीचे आणि ३०० मतदारांचे खेडेगाव आहे. हे गाव १९८२ मध्ये धरणग्रस्त झाले

संजय खासबागे - वरुडअमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या ऐलतीरावर वसलेले वरुड तालुक्यातील भापकी हे ५०० लोकवस्तीचे आणि ३०० मतदारांचे खेडेगाव आहे. हे गाव १९८२ मध्ये धरणग्रस्त झाले तर १९९१ मध्ये पूरग्रस्त. यामुळे हे गाव धरणग्रस्त की पूरग्रस्त, हा प्रश्न होता. त्यानंतर या गावाचा समावेश पूरग्रस्तांमध्ये करण्यात आला. परंतु अद्यापही या गावाचे यथायोग्य पुनर्वसन मात्र झालेले नाही. लोणी रस्त्यावर या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. याठिकाणी ग्रामपंचायत, शाळा, सार्वजनिक शौैचालये, नाल्या, रस्ते बांधले. मात्र, आवश्यक सोयी अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. भापकीवासीयांना त्यांच्या अधिग्रहित जागेचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. २१ वर्षांपासून येथील ग्रामस्थ केवळ आश्वासनांवर जगत आहेत. वर्धा नदीच्या काठावरील या गावाला ३०० वर्षांची परंपरा आहे. पूरग्रस्त होण्यापूर्वीच या गावात एसटी पोहोचली होती. यामुळे दळणवळण नियमित सुरु होते. १९८२ मध्ये अप्परवर्धा धरणाची मुहूर्तमेढ रोवल्यापासून गावापुढे पुनर्वसनाचा प्रश्न उभा ठाकला. तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे १९८४ मध्ये अर्ध्या गावाचे पूर्वीच्या गावालगत पुनर्वसन करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांना ३१ जुलै १९९१ च्या महापुराचा जबर फटका बसला. त्यामुळे या समृध्द अशा गावाचे वैभव लयाला गेले. यामुळे या गावाचा समावेश पूरग्रस्तांमध्ये झाला. त्यानंतर तालुक्यातील लहानमोठया गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, भापकी अपवाद ठरले. आज ना उद्या पुनर्वसन होईल, अशी प्रतीक्षा गावकऱ्यांना आजही लागलेली आहे. गावाची लोकसंख्या ५०० च्या घरात असली तरी २७५ मतदार मतदानाचा हक्क बजावतात. विशेष म्हणजे भापकी येथे गटग्रामपंचायत असून २१ वर्षांच्या काळात या गावाच्या विकासाकरिता एक छदामचाही निधी देण्यात आला नाही. येथील घरे पडकी आहेत. भिंती जीर्ण झालेल्या आहेत. येथे रस्ते, नाल्या नाहीत. गावात जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. बालकांकरिता एक अंगणवाडी असून सभोवताली गवत वाढलेले आहे. दोन शिक्षकी प्राथमिक शाळा असून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची मुले शिक्षण घेतात. २१ वर्षांचा वनवास भोगणारे हे तालुक्यातील एकमेव गाव आहे. दोन नेत्यांच्या वादात हे गाव पुनर्वसनापासून वंचित राहिल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली. घरांच्या बांधकामाकरिता मोबदला मिळालाच नसल्याने भापकीवासीयांनी पुनर्वसनाकडे पाठ फिरविली आहे. तर शासन दरबारी हा प्रस्ताव धूळखात असल्याचे सांगतात. जुन्या गावात नागरिक वास्तव्य करीत असताना शासनाने निधी देणे बंद केल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पळसवाडा हे गाव पुनर्वसित झाले असतानासुध्दा तेथे घरकूल योजना देण्यात येते. मात्र, भापकीवासीयांना ३० वर्षांपासून घरकूल योजना मिळाली नाही, ही भापकीवासियांची शोकांतिका आहे.