शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नियमबाह्य वर्गजोडणी उपसंचालकांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:25 IST

आरटीईनुसार १ किमी अंतराची अट न पाळता जेथे ५ वा वर्ग सुरू आहे व ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे ८ वा वर्ग सुरू आहे, अशा नियमबाह्य वर्गजोडणी बंद करण्यात याव्यात, असे शिक्षण उपसंचालकांनी निर्देशित करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना १९ मे पर्यंत मागितला आहे.

ठळक मुद्देवस्तुनिष्ठ अहवाल मागितला : शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीईनुसार १ किमी अंतराची अट न पाळता जेथे ५ वा वर्ग सुरू आहे व ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे ८ वा वर्ग सुरू आहे, अशा नियमबाह्य वर्गजोडणी बंद करण्यात याव्यात, असे शिक्षण उपसंचालकांनी निर्देशित करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना १९ मे पर्यंत मागितला आहे.शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात उपसंचालक प्राथमिक यांच्याकडे ही मागणी केली. त्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत निर्णय नाही, तोवर माघार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच शिक्षण संचालक कार्यालयाने हे पत्र निर्गमित केले. यावेळी शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हा सचिव मोहन ढोके, उपाध्यक्ष पी.आर.ठाकरे, नितीन टाले, अमरावती विभागीय प्रसिद्धिप्रमुख अजयसिंह बिसेन, आशिष बोरकर, आकाश भोयर, सुमित वानखडे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. भोयर यांनी गेल्या २ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. आता इयत्ता ५ व ८ वी चे नियमबाह्य जोडण्यात आलेले वर्ग बंद करण्यात यावे व अशा प्रकारचे वर्ग जोडण्यात येऊ नये, असे आदेश शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांनी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.असे आहेत शासनाचे आदेशशासनाचे २ जुलै २०१३ निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार इयत्ता ५ व ८ वीला वर्ग मान्यता दिली होती. परंतु, त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी इयत्ता १ ते ४ थी पर्यंत शाळा आहे व १ किमी परिसरात त्याच माध्यमाचा वर्ग उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ५ वा वर्ग जोडण्यात येऊ नये, तसेच ज्या ठिकाणी इयत्ता १ ते ७ पर्यंत शाळा आहे व ३ किमी परिसरामध्ये शिक्षणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी ८ वा वर्ग देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना दिले.