शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

प्रत्येक विहिरीची महसूलकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:48 IST

राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीरमालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करावी लागेल. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांसाठी ग्राह्य असेल. या अधिनियमाने आता विहिरीद्वारा भूगर्भातील अमर्याद पाणी उपशावर आता बंधने आली आहेत.

ठळक मुद्दे२० वर्षांसाठी परवानगी : अमर्याद पाणी उपशाला अधिनियमाने आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीरमालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करावी लागेल. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांसाठी ग्राह्य असेल. या अधिनियमाने आता विहिरीद्वारा भूगर्भातील अमर्याद पाणी उपशावर आता बंधने आली आहेत.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २५ जुलै रोजी अधिसूचनाद्वारा हा अधिनियम प्रसिद्ध केला. त्यानुसार, प्रत्येक विहीरमालकास (विंधन विहीर, खोदलेली विहीर, कूपनलिका) आपल्या विहिरीची नोंदणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे १८० दिवसांच्या आत करणे बंधनकारक केले आहे. विहिरीची मालकी ग्रामपंचायत वा अन्य संस्थेकडे असेल तरीही नोंदणी आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत महसूल विभागाद्वारा विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल. आता ६० मीटर खोल विहीर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यास परवानगी देण्यात येईल आणि अशी परवानगी देण्याचा अधिकार राज्य भूजल प्राधिकरणास राहील. अस्तित्वातील खोल विहिरींमधून शेती वा औद्योगिक वापरासाठी भूजलाचा उपसा करण्यावर महसूल विभागाद्वारा कर आकारणी होईल. १०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकामावर पाऊसपाणी साठवण संरचना बांधणे अनिवार्य आहे. त्याशिवाय अशा बांधकामास मान्यता व बांधकामास पाणीपुरवठा व भोगवटाचे प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे अधिनियमात नमूद आहे.भूजलावर आधारित योजनाराज्यातील अधिसूचित क्षेत्रामध्ये भूजलावर आधारित पीक योजना कृषी विभागामार्फत तयार करण्यात येईल. या पीक योजनेनुसारच पिके घेणे अनिवार्य राहणार आहे. जास्त पाणी लागणाºया पिकांच्या लागवडीसाठी पेरणीपूर्वी पाणलोटक्षेत्र जलसंपत्ती समितीकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.