शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

उत्कृष्ट कार्याबद्दल वनकर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:19 IST

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्षलागवडीत योगदान : अमरावती वनविभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.१३ कोटी वृक्षलागवडीत राज्य शासनाने अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सेवाभावी संस्था, वनाधिकारी कर्मचारी यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा संकल्प सोडला आहे. १३ कोटी वृक्षलागवडीत वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वनक्षेत्रात तब्बल १ लक्ष ४५०० रोपे लागवड करणाऱ्या पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल एका कार्यक्रमात गौरविण्यात आले. रोपवनाचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवत वनसंवर्धनाचा वेगळा संदेश देणाऱ्या वडाळीचे वनपाल राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनासुद्धा गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक हेमंत मीणा, अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे व अमरावती वनविभागाच्या विविध शाखेचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव संरक्षक स्वप्निल सोनोने, जयंत वडतकर व वनकर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत वन कर्मचाऱ्यानी स्वत:ला झोकून देत उद्दिष्टपूर्ती केली. सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्यात वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण झाले. त्याकरिता सूक्ष्म नियोजन, रोपवाटिकेतील कर्मचाºयांचे परिश्रम आदी बाबी महत्त्वाच्या ठरल्या, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली. डीएफओ मीणा यांचे नियोजनाबाबत सीसीएफने कौतुक केले.जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार वृक्षलागवडशासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार ५५१ इतकी लागवड झाली असून, २६ लाख इतक्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १२६.६३ टक्के इतके आहे. सर्व विभागांनी व समाजातील विविध घटकांनी मिळून ही मोहीम राबविल्याने हे यश मिळू शकले, असे जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा यांनी सांगितले. येथील महादेवखोरी परिक्षेत्रात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते १ जुलैला झाला होता. ३१ जुलै दरम्यान विविध विभागांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात ६० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती निवृत्त सहायक उपवनसंरक्षक बी.टी. इंगळे यांनी दिली आहे.