शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

उत्कृष्ट कार्याबद्दल वनकर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:19 IST

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्षलागवडीत योगदान : अमरावती वनविभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.१३ कोटी वृक्षलागवडीत राज्य शासनाने अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सेवाभावी संस्था, वनाधिकारी कर्मचारी यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा संकल्प सोडला आहे. १३ कोटी वृक्षलागवडीत वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वनक्षेत्रात तब्बल १ लक्ष ४५०० रोपे लागवड करणाऱ्या पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल एका कार्यक्रमात गौरविण्यात आले. रोपवनाचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवत वनसंवर्धनाचा वेगळा संदेश देणाऱ्या वडाळीचे वनपाल राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनासुद्धा गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक हेमंत मीणा, अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे व अमरावती वनविभागाच्या विविध शाखेचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव संरक्षक स्वप्निल सोनोने, जयंत वडतकर व वनकर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत वन कर्मचाऱ्यानी स्वत:ला झोकून देत उद्दिष्टपूर्ती केली. सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्यात वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण झाले. त्याकरिता सूक्ष्म नियोजन, रोपवाटिकेतील कर्मचाºयांचे परिश्रम आदी बाबी महत्त्वाच्या ठरल्या, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली. डीएफओ मीणा यांचे नियोजनाबाबत सीसीएफने कौतुक केले.जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार वृक्षलागवडशासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार ५५१ इतकी लागवड झाली असून, २६ लाख इतक्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १२६.६३ टक्के इतके आहे. सर्व विभागांनी व समाजातील विविध घटकांनी मिळून ही मोहीम राबविल्याने हे यश मिळू शकले, असे जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा यांनी सांगितले. येथील महादेवखोरी परिक्षेत्रात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते १ जुलैला झाला होता. ३१ जुलै दरम्यान विविध विभागांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात ६० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती निवृत्त सहायक उपवनसंरक्षक बी.टी. इंगळे यांनी दिली आहे.