शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाला कृषी विभाग जुमानेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 22:40 IST

जिल्ह्यात बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राला भरपाई मिळावी, यासाठी शासनाद्वारा ७ डिसेंबरला सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश व आठ दिवसांची डेडलाइन देण्यात आली.

ठळक मुद्देबोंड अळीचे पंचनामे अर्धवट : संयुक्त पथकाला होती ३० डिसेंबर डेडलाईन

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राला भरपाई मिळावी, यासाठी शासनाद्वारा ७ डिसेंबरला सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश व आठ दिवसांची डेडलाइन देण्यात आली. मात्र या मुदतीत अहवाल प्राप्त न झाल्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा २९ डिसेंबरला पत्र देऊन ३० डिसेंबरपूर्वी संयुक्त अहवाल मागितला. मात्र, अद्यापही तीन तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांचा अहवाल अप्राप्त आहे.गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश ७ डिसेंबरला देऊन एका आठवड्यात अहवाल मागितला. मात्र, या मुदतीला तीन आठवड्यांचा कालावधी झाला असतानाही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासनाने प्रपत्रात बदल केल्यामुळे यंत्रणांना वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात २ लाख ८ हजार क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र आहे. पेरणीकाळात अपुºया पावसामुळे शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. यामधून जी कपाशी बचावली तिच्यावर आॅक्टोबर महिन्यात पात्या-फुलांवर असताना गुलाबी बोंड अळीचा अटॅक झाला. यामध्ये जिल्ह्यातील किमान ८० टक्के क्षेत्रातील कपाशीचे पीक बाधित झाले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकावर शेतकºयांनी रोटाव्हेटर फिरविला. शेतकºयांना केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी राज्य शासनाने ७ डिसेंबरला पंचनाम्याचे आदेश दिलेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्याचे आदेश देऊन दोन दिवसांत अहवाल मागितला. मात्र या मुदतीतही पंचनामा व अहवाल प्राप्त न झाल्याने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी गंभीरतेने घेऊन ३० डिसेंबरला सायंकाळी ६ पूर्वी अहवाल सादर करण्याची तंबी दिली. मात्र यामध्ये प्रमुख भूमिका असणाºया कृषी विभागाने ही बाब गंभीरतेने न घेतल्यामुळे अद्यापही अहवाल अप्राप्त आहे.- तर तालुक्याला निधी नाही, आरडीसींची तंबीबोंड अळीच्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करून अहवाल सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा आतापर्यंत दोन वेळा पत्र देण्यात आले. मात्र, विहित कालावधीत अहवाल प्राप्त न झाल्याने पुन्हा सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन ३० डिसेंबरला अहवाल मागितला. मुदतीत अहवाल न आल्यास संबंधित तालुक्याचा अहवाल निरंक असल्याचे गृहीत धरून शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल. याविषयी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील, अशी तंबी आरडीसींनी दिली आहे.बोंड अळीबाधित क्षेत्राचे पंचनामे करताना जीपीएस इनबिल्ट फोटो द्यावे लागत असल्याने उशीर होत आहे. यासंदर्भात संयुक्त पथकाला अहवाल सादर करण्यास मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे.- नितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी