शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

परताव्याची टाळाटाळ; विमा कंपनीवर दंडात्मक कारवाई

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 10, 2023 17:13 IST

परतावा देण्याची टाळाटाळ करणाऱ्या पीक विमा कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले.

गजानन मोहोड

अमरावती: परतावा देण्याची टाळाटाळ करणाऱ्या पीक विमा कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले. त्यामुळे मागच्या खरीप हंगामापासून परताव्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या १३,६७२ शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची शक्यता आहे.

मागच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने उभ्या पिकाचे व काढणीपश्चात पिकांचे नुकसान झालेले आहे. याबाबत पीक विमा कंपनीकडे १.२५ लाख पूर्वसूचना शेतकऱ्यांनी दाखल केल्या होत्या. यापैकी २४,८५५ अर्ज कंपनीस्तरावर नाकारण्यात आले. हे अर्ज ग्राह्य धरावे यासाठी जिल्हाधिकारी, कृषी आयुक्तालयाने दिलेले आदेश कंपनीने नाकारलेले आहेत.

पीक विमा कंपनीद्वारा आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी ७८७६८ शेतकऱ्यांना ७९.१९ कोटी तर काढणीपश्चात नुकसानीसाठी ७१५२ शेतकऱ्यांना १२.२६ कोटी, असे एकूण ८५९२० शेतकऱ्यांना ९१.४५ कोटींचा परतावा दिलेला आहे. अद्याप १३,६७२ शेतकरी परताव्याच्या प्रतीक्षेत आहे. आता पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर या शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती