शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रेड्डी म्हणतात, त्या संघटनांच्या निवेदनाची दखल घेऊ नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभागात कार्यरत महिला कर्मचारी कर्तव्य बजावत असताना कामाच्या ठिकाणी ...

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभागात कार्यरत महिला कर्मचारी कर्तव्य बजावत असताना कामाच्या ठिकाणी होत असलेल्या समस्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यासंदर्भाच्या पत्राची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वीच दखल घेतली. मात्र, ज्यांच्याकडे हे पत्र अंमलबजावणीसाठी दिले, त्या निलंबित तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी शासनाच्या एका आदेशाचा हवाला देत शासनमान्यता नसलेल्या संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या कुठले निवेदनाची, अभिवेदनाची, पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट लिहिल्याचे पत्रच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर या संपूर्ण बाबी आता उघड होऊ लागल्या आहेत.

महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा अमरावतीच्यावतीने ८ मार्च २०२० रोजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, पालक सचिव आय.एस. कुंदन, जिल्हाधिकारी तथा वनविभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून मेळघाट वनविभागातील कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांवर कामाचा ठिकाणी होत असलेल्या समस्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करून त्यांच्या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यासंदर्भातील पत्र श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे उचित कारवाईसाठी पाठविले होते.

बॉक्स

काय होत्या मागण्या?

पुरुष कर्मचाऱ्यांसोबत एकट्या महिला कर्मचाऱ्यांना वावरावे लागते. शासकीय कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या नाहीत. त्यामुळे महिला वनपाल वनरक्षक असुरक्षित आहेत. महिलांना आवश्यक असलेल्या सुविधा मेळघाटात नाही. दिवसभर जंगल गस्त करून रात्री संरक्षण कॅम्पवर मुक्कामी राहण्यासाठी सक्ती करण्यात येते, अशा अनेक समस्या त्यात नमूद करण्यात आल्या.

शासननिर्णयाचा हवाला

श्रीनिवास रेड्डी यांनी महिलांचा प्रश्न गांभीर्याने न घेता, उलट शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विविध तारखांचा हवाला देत नियमांची मांडणी पत्रात केली. त्यानुसार महिलांच्या समस्या मांडणारी संघटना शासनाच्या यादीत नाही. त्यामुळे शासनमान्यता नसलेल्या संघटनेकडून प्राप्त होणाऱ्या कुठल्याही निवेदनाची, अभिवेदनाची, पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना शासनाच्या परिपत्रकात दिल्याचे श्रीनिवास रेड्डी यांनी पत्रात लिहिले. दुसरीकडे महिलांच्या छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याचे त्याच पत्रात खाली स्पष्ट केले.