शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर रेड्डींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

दीपाली चव्हाण यांंनी २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात श्रीनिवास रेड्डी हेदेखील तितकेच दोषी असल्याचे नमूद केले होते.  

ठळक मुद्देमुंबईला जाण्यापूर्वी एसपी कार्यालयातून मोहर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक  व तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डींना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. आयपीएस चौकशी पथकप्रमुख अपर पाेलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या आदेशाने ही कारवाई झाली. दीपाली चव्हाण यांंनी २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात श्रीनिवास रेड्डी हेदेखील तितकेच दोषी असल्याचे नमूद केले होते.  दरम्यान राज्य शासनाने दीपाली मृत्यूप्रकरणी श्रीनिवास रेड्डी याच्या भूमिकेच्या चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली. आयपीएस चौकशी पथकाने हरिसाल, अमरावती येथे २१ ते २८ पर्यंत दौरा केला. दीपाली प्रकरणाशी निगडित व्यक्ती, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी आयपीएस प्रज्ञा सरवदे अमरावतीत दाखल झाल्या. २७ एप्रिल रोजी सरवदे व त्यांच्या पथकाने हरिसाल गाठले. दीपाली प्रकरणाची संबंधित घटनास्थळाची पाहणी केली. येथे काही ठिकाणी निरीक्षण केले. वन कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आपबितीची माहिती घेतली. येथील राज्य राखीव दलाच्या विश्रामगृहात पथकातील सहकारी सदस्यांनी नोंदविलेल्या बयाणांवर बुधवारी मंथन केले. काही जणांसोबत त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, २८ एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता येथील एसपी कार्यालय गाठले. वस्तुस्थितीच्या आधारे आयपीएस प्रज्ञा सरवदे यांनी श्रीनिवास रेड्डीच्या अटकेचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. त्यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेेचे पथक ॲक्टिव्ह झाले आणि रेड्डी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूरच्या दिशेने पोलीस पथक रवाना झाले. डॉ. प्रज्ञा सरवदे यानंतर मुंबईकडे जाण्यासाठी नागपूर मार्गे वाहनाने रवाना झाल्या. त्या गेल्यानंतरही सकाळी १० ते १ असे तीन तास आयपीएस चौकशी पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणी केली, हे विशेष. दरम्यान, धारणी  येथील कनिष्ठ न्यायालयाने गुरुवारी श्रीनिवास रेड्डींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

धारणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अटक केली. फौजदारी कारवाईसाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही. आरोपपत्र न्यायालयात दाखल करताना मात्र शासनाला कळवावे लागतात. रेड्डींवर भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.- हरी बालाजी एन. पोलीस अधीक्षक, अमरावती

 

टॅग्स :forest departmentवनविभाग