शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

लाल मिरचीला दरवाढीचा तडका

By admin | Updated: July 11, 2015 00:36 IST

बाजारपेठेत लाल मिरचीची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे.

ग्राहकांना फटका : आवक घटल्याचा परिणामअमरावती : बाजारपेठेत लाल मिरचीची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे. परिणामी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाऱ्या मिरचीसाठी ग्राहकांना १२० ते १४० रुपये मोजावे लागत आहेत. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक व विक्रेता सुखावले आहेत. ग्राहकांना मात्र महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. एकरी पाच ते सहा क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन होते. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. तसेच नगदी पैसा मिळवून देणारे हे महत्त्वाचे पीक असल्याने शेतकरी काही प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात. यामध्ये जिल्ह्यात साधारणपणे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड केली जाते. हिरव्या मिरचीलादेखील सतत मागणी असल्याने ४० ते ६० रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत आहे. त्यामुळे उत्पादक हिरवी मिरची लाल होण्याची प्रतीक्षा करीत नाहीत. त्यामुळे ५०८ टक्क्यांपेक्षा अधिक हिरवी मिरची लगेच विक्री होते. मागील वर्षीपेक्षा यंदा लाल मिरचीचे दर प्रती किलो २० ते ४० रुपयांनी वाढले आहेत. उत्पादन कमी असल्याने मिरचीचे दर पुढे कायम राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)मिरचीचे महत्त्वसर्व वर्गातील लोकांच्या आहारातील महत्त्वपूर्ण भाजीपाला पीक आहे. मिरची रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. मिरचीमध्ये अ, ब, आणि क जीवनसत्त्व, कॅलशियम फॉस्फरस बऱ्याच प्रमाणात असते. घसा साफ होणे, श्वास नलिकेचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी आहे. बलवर्धक औषधींमध्ये याचा उपयोग होतो. मिरचीचे बहुउपयोगी गुण लक्षात घेता बाजारपेठेत मिरचीला वर्षभर मागणी असते. मिरचीची किंमत किमी-अधिक झाली तरी ग्राहकांना ती खरेदी करावीच लागते. याचे भाव बाजारपेठेत आल्यावर वाढतात हे निश्चित आहे. त्यामुळे भाववाढीचा लाभ उत्पादकांना होत नसून व्यापारी व दलालांना होतो. ग्राहक व उत्पादक दोन्ही नडवले जातात. कृत्रिम टंचाई निर्माण करुन अनेक जीवनावश्यक वस्तूंवर मधले विक्रेते अधिक नफा कमावत आहेत. त्यामुळे प्रशासन व शासन यांनी यावर नियंत्रण आणावे. - हर्षा कावरे,ग्राहक.