शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जातून विमा रकमेची वसुली

By admin | Updated: June 11, 2016 00:02 IST

शासनाच्या कृषी विभागाच्या पीककर्जाचा विमा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीचा असताना स्टेट बँकेद्वारा जनरल इन्शूरन्स ...

गजानन मोहोड अमरावतीशासनाच्या कृषी विभागाच्या पीककर्जाचा विमा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीचा असताना स्टेट बँकेद्वारा जनरल इन्शूरन्स मायक्रो फॉयनान्सची विमा पॉलीसीच्या नावे प्रत्येक शेतकऱ्याच्या पीककर्जातून ११५ रुपये परस्पर कापले जात आहे. सहा महिन्यांपासून एसबीआयने हा गोरखधंदा सुरू केला आहे. बहुतांश शेतकऱ्यांना ही पॉलीसी पीककर्जातून परस्पर वळती केल्याची माहितीच नाही. विशेष म्हणजे मागील वर्षीचा खरीप हंगाम संपला असताना एकाही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. स्टेट बँकेद्वारा डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ पासून जनरल इन्शुरन्स मायक्रो फायनान्स ही विमा पॉलीसी सुरू केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या पीककर्ज खात्यामधून या पॉलीसीचे ११५ रुपये परस्पर कापले जात आहे. या पॉलीसीमध्ये शेतकऱ्यांना ५० हजारांची भरपाई संरक्षित केली गेल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या शेतातील झोपडी जळाली, पारंपरिक शेतीची अवजारे चोरीला गेली, तसेच शेतमाल घरी आणत असताना पूर, आग किंवा अन्य कारणांनी खराब झाल्यास भरपाई मिळते, असे सांगण्यात आले. या पॉलीसीविषयीची कुठलीही माहिती शेतकऱ्यांना न देता त्यांच्या पीककर्जाच्या खात्यातून या पॉलीसीच्या नावे ११५ रूपये वळते करण्यात आलेले आहेत. शेतकरी याविषयी अनभिज्ञ आहे. अशाप्रकारे एसबीआयद्वारा हजारो शेतकऱ्यांच्या पीककर्जातून लाखो रुपयांची वसुली करण्यात आली. मागील वर्षीचा खरीप हंगाम संपला. आता खरीप २०१६ सुरू झाला आहे. परंतु एकाही शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी रक्कम मिळाली नाही. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्जाची मागणी केली असता बँकेच्या शाखांमध्ये याविषयीचे अर्जदेखील उपलब्ध नाहीत. ते अमरावतीच्या मुख्य शाखेतून घ्यावेत, असे सांगण्यात आलेत.नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्याचा बँकेचे पीककर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र शेतकरी अडचणीत असल्याचा फायदा घेऊन बँका या ना त्या प्रकारे शोषण करीत आहे. बँकींगविषयक अज्ञानाचा फायदा घेत एसबीआयने शेतकऱ्यांच्या शोषणाचा नवा फंडा उपयोगात आणला आहे.