शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

पीक कर्जातून विमा रकमेची वसुली

By admin | Updated: June 11, 2016 00:02 IST

शासनाच्या कृषी विभागाच्या पीककर्जाचा विमा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीचा असताना स्टेट बँकेद्वारा जनरल इन्शूरन्स ...

गजानन मोहोड अमरावतीशासनाच्या कृषी विभागाच्या पीककर्जाचा विमा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीचा असताना स्टेट बँकेद्वारा जनरल इन्शूरन्स मायक्रो फॉयनान्सची विमा पॉलीसीच्या नावे प्रत्येक शेतकऱ्याच्या पीककर्जातून ११५ रुपये परस्पर कापले जात आहे. सहा महिन्यांपासून एसबीआयने हा गोरखधंदा सुरू केला आहे. बहुतांश शेतकऱ्यांना ही पॉलीसी पीककर्जातून परस्पर वळती केल्याची माहितीच नाही. विशेष म्हणजे मागील वर्षीचा खरीप हंगाम संपला असताना एकाही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. स्टेट बँकेद्वारा डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ पासून जनरल इन्शुरन्स मायक्रो फायनान्स ही विमा पॉलीसी सुरू केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या पीककर्ज खात्यामधून या पॉलीसीचे ११५ रुपये परस्पर कापले जात आहे. या पॉलीसीमध्ये शेतकऱ्यांना ५० हजारांची भरपाई संरक्षित केली गेल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या शेतातील झोपडी जळाली, पारंपरिक शेतीची अवजारे चोरीला गेली, तसेच शेतमाल घरी आणत असताना पूर, आग किंवा अन्य कारणांनी खराब झाल्यास भरपाई मिळते, असे सांगण्यात आले. या पॉलीसीविषयीची कुठलीही माहिती शेतकऱ्यांना न देता त्यांच्या पीककर्जाच्या खात्यातून या पॉलीसीच्या नावे ११५ रूपये वळते करण्यात आलेले आहेत. शेतकरी याविषयी अनभिज्ञ आहे. अशाप्रकारे एसबीआयद्वारा हजारो शेतकऱ्यांच्या पीककर्जातून लाखो रुपयांची वसुली करण्यात आली. मागील वर्षीचा खरीप हंगाम संपला. आता खरीप २०१६ सुरू झाला आहे. परंतु एकाही शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी रक्कम मिळाली नाही. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्जाची मागणी केली असता बँकेच्या शाखांमध्ये याविषयीचे अर्जदेखील उपलब्ध नाहीत. ते अमरावतीच्या मुख्य शाखेतून घ्यावेत, असे सांगण्यात आलेत.नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्याचा बँकेचे पीककर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र शेतकरी अडचणीत असल्याचा फायदा घेऊन बँका या ना त्या प्रकारे शोषण करीत आहे. बँकींगविषयक अज्ञानाचा फायदा घेत एसबीआयने शेतकऱ्यांच्या शोषणाचा नवा फंडा उपयोगात आणला आहे.