शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

नोंद कापसाची; घरी बोंडही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी ही कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सुरू आहे. ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचेच चांगभले होत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचाच सातबारा लावून शासनाला कापूस विकत असल्याचा प्रकार येथे होत आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत.

ठळक मुद्देशासकीय कापूस खरेदी : तपासणी मोहिमेत प्रकार उघड, बहुतांश शेतकऱ्यांची नोंदणी रद्द

चेतन घोगरे।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये व त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाकडून हमीभावाने कापूस खरेदी सुरू असली तरी याचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात व्यापारी घेत असल्याची ओरड होत आहे. याच मुद्द्यावर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत असला प्रकार समोर येत आहे. नाफेडकडे नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंडही नसल्याचे चौकशीत समोर येत आहे. अशा शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी रद्द होत असल्याने त्यांच्याकडून टोकन घेणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी ही कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सुरू आहे. ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचेच चांगभले होत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचाच सातबारा लावून शासनाला कापूस विकत असल्याचा प्रकार येथे होत आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत.दरम्यान, यासंबंधी वृत्ताने संबंधित नोंदणी व नियंत्रण करणाऱ्या संस्था खडबडून जाग्या झाल्या व त्यांनी अंतिम टप्प्यात का होईना, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस आहे की नाही, याबाबत तपासणी सुरू केली. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापूसच आढळला नसल्याने त्यांनी नाफेडकडे केलेली नोंदणी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सोसायटी कर्मचाऱ्यांसमक्ष तात्काळ पंचनामा करून रद्द करण्यात येत आहे. या धडक कारवाईने शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन कापूस विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर चाप बसला आहे. खऱ्यांशेतकऱ्यांची कापूस खरेदीची प्रतीक्षा कमी झाली आहे. कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सातबारा वापरून बोगस नोंदी करून शासकीय योजनेचा लाभ लाटणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ फौजदारी दाखल करण्याचे तेथील पालकमंत्र्यांनी जसे आदेश दिले, तसे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्याशिवाय या गोरखधंद्यास चाप बसणार नाही, अशा प्रतिक्रिया काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.टोकन विक्री दलाल सक्रियज्या शेतकऱ्यांनी आपल्या सात-बारा दाखवून नाफेडकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, पण त्यांच्याकडे कापूस नाही, अशा शेतकऱ्यांना काही दलाल भेटून, त्यांना पैशाची लालूच देऊन टोकन मिळवित आहेत. या माध्यामातून हे दलाल कापूस व्यापाऱ्यांकडून हजारो रुपये कमावित असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही दिवसांपासून ‘लोकमत’च्या अंकात कापसाच्या अशा हेराफेरीबाबत वृत्त प्रकाशित होत आहे. त्याची दखल घेऊन चौकशी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.तालुक्यातील किती शेतकऱ्यांची कापूस खरेदी शिल्लक आहे, यासाठी तपासणी सुरू आहे. बहुतांश नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या घरातील स्थितीचे पंचनामे करून त्यांंची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. लवकरच अहवाल पूर्ण होईल.- स्वाती गुडधेसहायक निबंधकअंजनगाव सुर्जी

टॅग्स :cottonकापूस