शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतींची पुनर्रचना

By admin | Updated: June 21, 2016 00:12 IST

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळख जपलेल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकास साधला जातो.

समिती : विभागीय आयुक्तांकडे नेतृत्वअमरावती : ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळख जपलेल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकास साधला जातो. शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केली जाते. अशा नागरिक व प्रशासनामधील दुवा असलेल्या ग्रामपंचायतींची पुनर्रचना केली जाणार आहे. गावविकासासाठी लहान ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतची व्यवहार्यता तपासण्याकरिता तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी दिले होते. त्या अनुसरून अमरावती विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. लहान ग्रामपंचायती स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासून स्वतंत्र, नवीन आणि त्रिशंकू भाग ग्रामपंचायत स्थापनेकरिता सुधारित निकष ठरविण्यासाठी ही समिती कार्यान्वित केली आहे. नवीन आणि स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी १२ फेब्रुवारी २००४ च्या शासन निर्णयानुसार निर्गमित केलेले निकष आणि सर्वसमावेशक सूचनांचा सर्वंकष आढावा घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार सुधारित निकष ठरविले जाणार आहेत. तांडे आणि आदिवासी पाड्यांकरिता स्वतंत्र ग्रामपंचायत असावी का, त्यासाठी लोकसंख्येची व दरडोई उत्पन्नाची अट शिथिल करता येईल का, याबाबतचा अभ्यासह या ४ सदस्य समितीला करायचा आहे. सुधारित निकषानुसार नव्याने अस्तित्वात येणाऱ्या ग्रामपंचायती कार्यान्वित करण्यासाठी सरकारवर किती आर्थिक बोझा पडेल, याचा तपशीलही समितीला द्यायचा आहे. दोन महिन्यांत हा सर्वंकष अहवाल आल्यानंतर नवीन आणि स्वतंत्र ग्रामपंचायतींचा मार्ग प्रशस्त बनणार आहे. (प्रतिनिधी)अशी असेल समितीची कार्यकक्षागावांचा विकास करण्याकरिता लहान ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतची व्यवहार्यता तपासणे, स्वतंत्र नवीन त्रिशंकू भाग यासाठी ग्रामपंचायत स्थापनेकरिता सुधारित निकष व सर्व समावेश सूचना करणे, तांडे आणि आदिवासी पाड्यांकरिता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेकरिता लोकसंख्येची अट, दरडोई उत्पन्नाची अट शिथिल करण्याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी या समितीकडे असेल. दरडोई उत्पन्नाकरिता वार्षिक कररुपी उत्पन्नाची परिगणना करण्याकरिता करांची निश्चिती करणे व सोबतच ग्रामपंचायत स्थापनेकरिता स्वतंत्र प्रपत्र तयार करणे व आवश्यक कागदपत्रे निश्चित करावी, अशाप्रकारे या समितीची कार्यकक्षा ठरविण्यात आली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडे अध्यक्षपदाची धुराग्रामपंचायत स्थापनेकरिता सुधारित निकष ठरविण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (आस्थापना) इत्यादी सदस्य तर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त राजाराम झेंडे या समितीच्या सदस्य सचिवपदी राहतील. या समितीला संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींचा, गाव, तांडे आणि वाड्यांचा अभ्यास करून अहवाल द्यायचा आहे.दोन महिन्यांची मुदतचार सदस्यीय समितीला २ महिन्यात अहवाल द्यायचा आहे. हा अहवाल परिपूर्ण होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व अन्य क्षेत्रीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या शिफारशी घ्याव्यात, अशा सूचना आहेत.