शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतींची पुनर्रचना

By admin | Updated: June 21, 2016 00:12 IST

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळख जपलेल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकास साधला जातो.

समिती : विभागीय आयुक्तांकडे नेतृत्वअमरावती : ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळख जपलेल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकास साधला जातो. शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केली जाते. अशा नागरिक व प्रशासनामधील दुवा असलेल्या ग्रामपंचायतींची पुनर्रचना केली जाणार आहे. गावविकासासाठी लहान ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतची व्यवहार्यता तपासण्याकरिता तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी दिले होते. त्या अनुसरून अमरावती विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. लहान ग्रामपंचायती स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासून स्वतंत्र, नवीन आणि त्रिशंकू भाग ग्रामपंचायत स्थापनेकरिता सुधारित निकष ठरविण्यासाठी ही समिती कार्यान्वित केली आहे. नवीन आणि स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी १२ फेब्रुवारी २००४ च्या शासन निर्णयानुसार निर्गमित केलेले निकष आणि सर्वसमावेशक सूचनांचा सर्वंकष आढावा घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार सुधारित निकष ठरविले जाणार आहेत. तांडे आणि आदिवासी पाड्यांकरिता स्वतंत्र ग्रामपंचायत असावी का, त्यासाठी लोकसंख्येची व दरडोई उत्पन्नाची अट शिथिल करता येईल का, याबाबतचा अभ्यासह या ४ सदस्य समितीला करायचा आहे. सुधारित निकषानुसार नव्याने अस्तित्वात येणाऱ्या ग्रामपंचायती कार्यान्वित करण्यासाठी सरकारवर किती आर्थिक बोझा पडेल, याचा तपशीलही समितीला द्यायचा आहे. दोन महिन्यांत हा सर्वंकष अहवाल आल्यानंतर नवीन आणि स्वतंत्र ग्रामपंचायतींचा मार्ग प्रशस्त बनणार आहे. (प्रतिनिधी)अशी असेल समितीची कार्यकक्षागावांचा विकास करण्याकरिता लहान ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतची व्यवहार्यता तपासणे, स्वतंत्र नवीन त्रिशंकू भाग यासाठी ग्रामपंचायत स्थापनेकरिता सुधारित निकष व सर्व समावेश सूचना करणे, तांडे आणि आदिवासी पाड्यांकरिता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेकरिता लोकसंख्येची अट, दरडोई उत्पन्नाची अट शिथिल करण्याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी या समितीकडे असेल. दरडोई उत्पन्नाकरिता वार्षिक कररुपी उत्पन्नाची परिगणना करण्याकरिता करांची निश्चिती करणे व सोबतच ग्रामपंचायत स्थापनेकरिता स्वतंत्र प्रपत्र तयार करणे व आवश्यक कागदपत्रे निश्चित करावी, अशाप्रकारे या समितीची कार्यकक्षा ठरविण्यात आली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडे अध्यक्षपदाची धुराग्रामपंचायत स्थापनेकरिता सुधारित निकष ठरविण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (आस्थापना) इत्यादी सदस्य तर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त राजाराम झेंडे या समितीच्या सदस्य सचिवपदी राहतील. या समितीला संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींचा, गाव, तांडे आणि वाड्यांचा अभ्यास करून अहवाल द्यायचा आहे.दोन महिन्यांची मुदतचार सदस्यीय समितीला २ महिन्यात अहवाल द्यायचा आहे. हा अहवाल परिपूर्ण होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व अन्य क्षेत्रीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या शिफारशी घ्याव्यात, अशा सूचना आहेत.