शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

प्रलंबित कृषिपंपांच्या जोडणीसाठी तंबी

By admin | Updated: June 11, 2017 00:07 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही.

पालकमंत्री संतापले : संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही. ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांर्भीयाने घेतली आहे. ह्या जोडण्यांचे काम त्वरित करण्यात यावे व यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात पाच हजार ६०० कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.पालकमंत्र्यांनी शिवारफेरीच्या निमित्ताने जिल्ह्यातील १२३ गावांना भेटी दिल्यात, या संपर्क अभियानाच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यावेळी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. या पार्श्वभूमीवर वीजजोडणी संदर्भात तक्रारींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिलेत. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेहेत्रे, कार्यकारी अभियंता डी.बी. मोहोड, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या अर्जावर वर्षानुवर्ष जर कार्यवाही होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. यासाठी संबधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. कामासाठी नियुक्त कंत्राटदार जर ऐकत नसेल तर याविषयी वरिष्ठांना कळविणे आवश्यक आहे. शेतकरी, नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची दर १५ दिवसांत बैठक घ्यावी व अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. रोहीत्र बसविणे किंवा नादुरूस्त असलेले बदलविणे आदीविषयी प्राप्त अर्जांवरदेखील कार्यवाही करावी. विहीत मुदतीत सौर कृषिपंपांचे काम व उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याचे व वाकल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.वीज अपघाताची सर्व प्रकरणे मंजूर कराअनेकदा विजेच्या धक्कयाने अपघात होवून नागरिक दगावतात. त्या व्यक्तींच्या परिवाराने मदतीसाठी केलेले अर्ज नामंजूर करण्याचे प्रकार घडतात. यापुढे असा एकही प्रकार होता कामा नये, असी तंबी त्यांनी दिली. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांसी सौजन्याने वागले पाहिजेत. त्यांच्या मागण्या समजवून घेवून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.व त्यांना वस्तूस्थितीची माहिती दिली पाहिजे असे पालकमंत्र्यांनी सांगीतले. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी आहेत व १७०० कृषिपंप वाटपाचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट विहीत कालावधित पूर्ण करावे व शेतकऱ्यांप्रति अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.