शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित कृषिपंपांच्या जोडणीसाठी तंबी

By admin | Updated: June 11, 2017 00:07 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही.

पालकमंत्री संतापले : संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही. ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांर्भीयाने घेतली आहे. ह्या जोडण्यांचे काम त्वरित करण्यात यावे व यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात पाच हजार ६०० कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.पालकमंत्र्यांनी शिवारफेरीच्या निमित्ताने जिल्ह्यातील १२३ गावांना भेटी दिल्यात, या संपर्क अभियानाच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यावेळी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. या पार्श्वभूमीवर वीजजोडणी संदर्भात तक्रारींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिलेत. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेहेत्रे, कार्यकारी अभियंता डी.बी. मोहोड, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या अर्जावर वर्षानुवर्ष जर कार्यवाही होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. यासाठी संबधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. कामासाठी नियुक्त कंत्राटदार जर ऐकत नसेल तर याविषयी वरिष्ठांना कळविणे आवश्यक आहे. शेतकरी, नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची दर १५ दिवसांत बैठक घ्यावी व अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. रोहीत्र बसविणे किंवा नादुरूस्त असलेले बदलविणे आदीविषयी प्राप्त अर्जांवरदेखील कार्यवाही करावी. विहीत मुदतीत सौर कृषिपंपांचे काम व उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याचे व वाकल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.वीज अपघाताची सर्व प्रकरणे मंजूर कराअनेकदा विजेच्या धक्कयाने अपघात होवून नागरिक दगावतात. त्या व्यक्तींच्या परिवाराने मदतीसाठी केलेले अर्ज नामंजूर करण्याचे प्रकार घडतात. यापुढे असा एकही प्रकार होता कामा नये, असी तंबी त्यांनी दिली. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांसी सौजन्याने वागले पाहिजेत. त्यांच्या मागण्या समजवून घेवून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.व त्यांना वस्तूस्थितीची माहिती दिली पाहिजे असे पालकमंत्र्यांनी सांगीतले. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी आहेत व १७०० कृषिपंप वाटपाचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट विहीत कालावधित पूर्ण करावे व शेतकऱ्यांप्रति अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.