शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 14, 2017 00:16 IST

वरूड तालुक्यातील ब्रिटिशकालीन एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजारपेठ सद्यस्थितीत समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : मिरची बाजारावरही अवकळाराजुराबाजार : वरूड तालुक्यातील ब्रिटिशकालीन एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजारपेठ सद्यस्थितीत समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. एकेकाळी नावारूपास आलेल्या या बाजारपेठेची दुरवस्था झाली आहे. ही बाजारपेठ विदर्भात नावारूपास आली होती. येथील हिरव्या मिरचीची आंतरराज्यीय बाजारपेठसुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र, या बाजारपेठेवरही काही वर्षांपासून अवकळा आली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांचे या बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून विदर्भातील ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार हळूहळू काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजुराबाजार सर्कल हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत पदे मिळविणारा हा परिसर आहे. यातच माजी आमदार, माजी मंत्र्यांचा परिसर आहे. परंतु ‘नाव मोठे दर्शन खोटे’ या उक्तीप्रमाणे विदर्भातील ब्रिटिशकालीन प्रसिद्ध गुरांच्या बाजारपेठेची पत राखण्यास लोकप्रतिनिधी असमर्थ ठरले आहेत. आमला-पुलगाव या मिल्ट्रीच्या रस्त्यावर असलेल्या राज्य महामार्गावर ही बाजारपेठ आहे. येथून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरची पाठविली जाते. येथील गुरांच्या बाजारात विदर्भासह खानदेशातूनसुद्धा गुरे विक्रीला आणली जातात. या बाजारात ब्रिटिशकालीन लोखंडी खांब गुरे बांधण्याकरिता लावण्यात आले होते, तर शेतकऱ्यांसाठी शौचालयेदेखील होती. इतकेच नव्हे तर मुक्कामाकरिता मडग्या, बाजार ओटे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. परंतु या बाजाराचे राजकारण्याच्या हेवेदाव्यात संपूर्ण वैभव हरपले आहे. आतील प्रसाधनगृहांची मोडतोड झाली असून गुरे बांधण्यासाठी लावलेले लोखंडी खांबसुद्धा तुटले आहेत. मडग्या अतिक्रमणाने लोप पावल्या आहेत. घाणीचे साम्राज्य कमालीचे वाढले आहे. दिवाबत्तीची सुविधा नाही. हॉटेलच्या सांडपाण्याची विल्हेवाट होत नसल्याने वराहांचा त्रास वाढला. या बाजारासोबत १०० खेड्यांचा संपर्क असूनसुद्धा बसस्थानक नसल्याने रस्त्यावर बसेस उभ्या राहतात. महिलांसाठी शौचालय आणि मुत्रीघर नसल्याने महिलांची कुचंबणा होते. येथील बाजारात हजारो नागरिक खेड्यापाड्यांतून येत असून धान्यबाजार, कोंबडी, मिरची बाजार तसेच गुरांच्या बाजाराचे वैभव हरपत चालले आहे. बाजार समितीकडून सुद्धा याकडे दुर्लक्ष असून केवळ राजकीय हेवेदाव्यात राजुरा बाजारचा विकास खुंटल्याची चर्चा आहे. बाजारात मटणविक्री उघड्यावर केली जात असल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचा धूर व धूळ उघडया मांसावर बसल्याने विविध आजार बळावत आहेत. परंतु कोणीही मांस विक्रेत्याची चौकशी अथवा बोकडाची तपासणी करीत नाही. यामुळे केवळ जागेच्या वादामुळे बाजाराची जागा नेमकी कुणाची, हा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतो. निवडणूक आटोपली की पुन्हा हा मुद्दा दुर्लक्षित होतो. बाजारापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून येथे आधुनिक सुसज्ज अशी बाजारपेठ निर्माण झाली असती, असाही एक सूर आहे.