शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 14, 2017 00:16 IST

वरूड तालुक्यातील ब्रिटिशकालीन एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजारपेठ सद्यस्थितीत समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : मिरची बाजारावरही अवकळाराजुराबाजार : वरूड तालुक्यातील ब्रिटिशकालीन एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजारपेठ सद्यस्थितीत समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. एकेकाळी नावारूपास आलेल्या या बाजारपेठेची दुरवस्था झाली आहे. ही बाजारपेठ विदर्भात नावारूपास आली होती. येथील हिरव्या मिरचीची आंतरराज्यीय बाजारपेठसुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र, या बाजारपेठेवरही काही वर्षांपासून अवकळा आली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांचे या बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून विदर्भातील ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार हळूहळू काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजुराबाजार सर्कल हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत पदे मिळविणारा हा परिसर आहे. यातच माजी आमदार, माजी मंत्र्यांचा परिसर आहे. परंतु ‘नाव मोठे दर्शन खोटे’ या उक्तीप्रमाणे विदर्भातील ब्रिटिशकालीन प्रसिद्ध गुरांच्या बाजारपेठेची पत राखण्यास लोकप्रतिनिधी असमर्थ ठरले आहेत. आमला-पुलगाव या मिल्ट्रीच्या रस्त्यावर असलेल्या राज्य महामार्गावर ही बाजारपेठ आहे. येथून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरची पाठविली जाते. येथील गुरांच्या बाजारात विदर्भासह खानदेशातूनसुद्धा गुरे विक्रीला आणली जातात. या बाजारात ब्रिटिशकालीन लोखंडी खांब गुरे बांधण्याकरिता लावण्यात आले होते, तर शेतकऱ्यांसाठी शौचालयेदेखील होती. इतकेच नव्हे तर मुक्कामाकरिता मडग्या, बाजार ओटे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. परंतु या बाजाराचे राजकारण्याच्या हेवेदाव्यात संपूर्ण वैभव हरपले आहे. आतील प्रसाधनगृहांची मोडतोड झाली असून गुरे बांधण्यासाठी लावलेले लोखंडी खांबसुद्धा तुटले आहेत. मडग्या अतिक्रमणाने लोप पावल्या आहेत. घाणीचे साम्राज्य कमालीचे वाढले आहे. दिवाबत्तीची सुविधा नाही. हॉटेलच्या सांडपाण्याची विल्हेवाट होत नसल्याने वराहांचा त्रास वाढला. या बाजारासोबत १०० खेड्यांचा संपर्क असूनसुद्धा बसस्थानक नसल्याने रस्त्यावर बसेस उभ्या राहतात. महिलांसाठी शौचालय आणि मुत्रीघर नसल्याने महिलांची कुचंबणा होते. येथील बाजारात हजारो नागरिक खेड्यापाड्यांतून येत असून धान्यबाजार, कोंबडी, मिरची बाजार तसेच गुरांच्या बाजाराचे वैभव हरपत चालले आहे. बाजार समितीकडून सुद्धा याकडे दुर्लक्ष असून केवळ राजकीय हेवेदाव्यात राजुरा बाजारचा विकास खुंटल्याची चर्चा आहे. बाजारात मटणविक्री उघड्यावर केली जात असल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचा धूर व धूळ उघडया मांसावर बसल्याने विविध आजार बळावत आहेत. परंतु कोणीही मांस विक्रेत्याची चौकशी अथवा बोकडाची तपासणी करीत नाही. यामुळे केवळ जागेच्या वादामुळे बाजाराची जागा नेमकी कुणाची, हा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतो. निवडणूक आटोपली की पुन्हा हा मुद्दा दुर्लक्षित होतो. बाजारापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून येथे आधुनिक सुसज्ज अशी बाजारपेठ निर्माण झाली असती, असाही एक सूर आहे.