शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

तापी नदीवरील पुनर्भरण योजनेमुळे होणार हरितक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 01:03 IST

मेळघाटातील खाऱ्या-घुटी येथे धरण बांधले जाणार आहे. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी कालव्याच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण केले जाईल. प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘टास्क फोर्स’ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा हा खान्देशसह संपूर्ण अमरावती जिल्ह्याला होणार आहे.

ठळक मुद्देआनंदराव अडसूळ यांचा विश्वास : अमरावती जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील खाऱ्या-घुटी येथे धरण बांधले जाणार आहे. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी कालव्याच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण केले जाईल. प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘टास्क फोर्स’ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा हा खान्देशसह संपूर्ण अमरावती जिल्ह्याला होणार आहे. शासनाचा हा निर्णय ‘सुजलाम् सुफलाम’ प्रदेशाच्या दिशेने वाटचाल करणारा असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी धारणी येथील प्रचार सभेत व्यक्त केला.व्यासपीठावर शैलू मालवीय, अनिल मालवीय, अप्पा पाटील, सुखदेव शनवारे, श्याम गंगराडे, टिल्लू तिवारी, भगवान मुंडे यांच्यासह भाजप-शिवसेना-रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना अडसूळ म्हणाले, हा प्रकल्प जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी भूजल पातळी वाढण्यास साहाय्यभूत ठरू शकणारा तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणासाठी भारतीय सैन्याने परवानगी दिली आहे. शासनाचे डीपीआर तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ‘लिडार’ या आधुनिक पद्धतीने हे सर्वेक्षण केले आहे. या प्रकल्प अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, विरोधक या प्रकल्पाचा कोणताही अभ्यास न करता आदिवासींची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान होण्याची भीती आनंदराव अडसूळ यांनी वर्तविली.तापी प्रकल्पाचे हे आहेत फायदेतापी नदीतून गुजरातला वाहून जाणाºया ४५.५० टीएमसी पाण्याचा वापर होईल. ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. या योजनेमुळे प्रत्यक्ष १ लाख २ हजार हेक्टरवर सिंचन होईल. महाराष्ट्राला २ लाख ३७ हजार, तर मध्य प्रदेशला १ लाख ७४ हजार हेक्टरमध्ये लाभ होईल. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिचंनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राला २० टीएमसी, तर मध्य प्रदेशला २५.५० टीएमसी असे ४५.५० टीएमसी पाणी तापी नदीतून वापरता येणार आहे. भूमिगत बंधारे, गॅबिअन बंधारे, पुनर्भरण विहिरी, इंजेक्शन वेल्स व साठवण बंधारे बांधून त्याद्वारे पुनर्भरण केले जाईल. खोल गेलेली भूगर्भातील पाणीपातळी उंचावणे आणि निर्माण होणाºया पाणीसाठ्याद्वारे सिंचन करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाला ९९५८ कोटी खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळ