शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

एमबीए विभागातील कागदपत्रे गहाळप्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

कुलसचिवांचे पत्र, हेमा शर्मा यांना अहवाल देण्यासंदर्भात विधी विभागाकडे पाठविला प्रस्ताव अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून ...

कुलसचिवांचे पत्र, हेमा शर्मा यांना अहवाल देण्यासंदर्भात विधी विभागाकडे पाठविला प्रस्ताव

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून १० विद्यार्थ्यांची कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी कुलगुरूंच्या आदेशान्वये गठित चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, तक्रारकर्ती विद्यार्थिनी हेमा शर्मा यांना चौकशी अहवाल देता येणार अथवा नाही, यासंदर्भात विधी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हा अहवाल विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर देशमुख यांनी सोमवारी कुलगुरूंची भेट घेतली.

कुलसचिव तुषार देशमुख यांनी ३ मे रोजी हेमा शर्मा यांना पाठविलेल्या पत्रानुसार, एमबीए विभागातील कागदपत्र गहाळप्रकरणी चौकशी अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे समितीने सादर केला आहे. हा अहवाल विधी विभागाकडे कायदेशीर सल्ल्याकरिता पाठविला आहे. या अहवालावर उचित कार्यवाही झाल्यानंतर यथावकाश कळविण्यात येईल. यामुळे हा चौकशी अहवाल अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना केव्हा मिळणार, हे गुलदस्त्यात आहे.

कुलसचिवांनी पत्राची प्रत राज्यपाल कार्यालयाचे सचिव, पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, सिनेट सदस्य मनीष गवई, तंत्रशिक्षण संचालकांना पाठविली. तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांना चौकशी समितीचा अहवाल मिळणे हा त्यांचा हक्क असल्याची बाब सिनेट सदस्य मनीष गवई, सागर देशमुख यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. आता याप्रकरणी विधी विभागाकडून काय उत्तर मिळते अथवा कालापव्यय तर होत नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

---------------

काय आहे प्रकरण?

विद्यापीठाच्या एमबीए विभागात सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे दिली होती. ही कागदपत्रे एमबीए विभागातून अचानक गायब झाली. यात चार विद्यार्थ्यांच्या पदवी गुणपत्रिका, पाच विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र, तर एका विद्यार्थ्याच्या जातीच्या दाखल्याचा समावेश आहे. विद्यापीठाने १० विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, जात वैधता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत स्वाधीन केली. मात्र, मूळ कागदपत्रे घेऊन दुय्यम प्रत देण्यात आल्याप्रकरणी कुलगुरू, एमबीए विभागप्रमुख दीपक चाचरकर यांना जाब विचारला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले. चार विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले. पहिल्या सत्राची परीक्षा उत्तीर्ण नसल्याने विद्यापीठाने निकाल रोखले. त्यानंतर याप्रकरणी कुलगुरूंनी चौकशी समिती गठित केली आणि आता अहवाल प्राप्त झाला. यात दोषी असलेल्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी केली आहे.