शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

एमबीए विभागातील कागदपत्रे गहाळप्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

कुलसचिवांचे पत्र, हेमा शर्मा यांना अहवाल देण्यासंदर्भात विधी विभागाकडे पाठविला प्रस्ताव अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून ...

कुलसचिवांचे पत्र, हेमा शर्मा यांना अहवाल देण्यासंदर्भात विधी विभागाकडे पाठविला प्रस्ताव

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून १० विद्यार्थ्यांची कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी कुलगुरूंच्या आदेशान्वये गठित चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, तक्रारकर्ती विद्यार्थिनी हेमा शर्मा यांना चौकशी अहवाल देता येणार अथवा नाही, यासंदर्भात विधी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हा अहवाल विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर देशमुख यांनी सोमवारी कुलगुरूंची भेट घेतली.

कुलसचिव तुषार देशमुख यांनी ३ मे रोजी हेमा शर्मा यांना पाठविलेल्या पत्रानुसार, एमबीए विभागातील कागदपत्र गहाळप्रकरणी चौकशी अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे समितीने सादर केला आहे. हा अहवाल विधी विभागाकडे कायदेशीर सल्ल्याकरिता पाठविला आहे. या अहवालावर उचित कार्यवाही झाल्यानंतर यथावकाश कळविण्यात येईल. यामुळे हा चौकशी अहवाल अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना केव्हा मिळणार, हे गुलदस्त्यात आहे.

कुलसचिवांनी पत्राची प्रत राज्यपाल कार्यालयाचे सचिव, पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, सिनेट सदस्य मनीष गवई, तंत्रशिक्षण संचालकांना पाठविली. तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांना चौकशी समितीचा अहवाल मिळणे हा त्यांचा हक्क असल्याची बाब सिनेट सदस्य मनीष गवई, सागर देशमुख यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. आता याप्रकरणी विधी विभागाकडून काय उत्तर मिळते अथवा कालापव्यय तर होत नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

---------------

काय आहे प्रकरण?

विद्यापीठाच्या एमबीए विभागात सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे दिली होती. ही कागदपत्रे एमबीए विभागातून अचानक गायब झाली. यात चार विद्यार्थ्यांच्या पदवी गुणपत्रिका, पाच विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र, तर एका विद्यार्थ्याच्या जातीच्या दाखल्याचा समावेश आहे. विद्यापीठाने १० विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, जात वैधता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत स्वाधीन केली. मात्र, मूळ कागदपत्रे घेऊन दुय्यम प्रत देण्यात आल्याप्रकरणी कुलगुरू, एमबीए विभागप्रमुख दीपक चाचरकर यांना जाब विचारला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले. चार विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले. पहिल्या सत्राची परीक्षा उत्तीर्ण नसल्याने विद्यापीठाने निकाल रोखले. त्यानंतर याप्रकरणी कुलगुरूंनी चौकशी समिती गठित केली आणि आता अहवाल प्राप्त झाला. यात दोषी असलेल्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी केली आहे.