शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे १०९ कोटी प्राप्त

By admin | Updated: January 11, 2017 00:09 IST

खरीप २०१५ मध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला.

शेतकऱ्यांना दिलासा : खरीप २०१५मधील कापूस, सोयाबीनचे नुकसानअमरावती : खरीप २०१५ मध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. यासाठी मदतीचे १०९ कोटी ३६ लाख रुपये मंगळवारी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. शासनाने सन २०१५ च्या दुष्काळी जिल्ह्यांची यादी घोषित केली. जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत असून सुद्धा जिल्ह्याचा दुष्काळयादीत समावेश नव्हता. तसेच एनडीआरएफच्या निकषान्वये शासनाने मदतही दिली नाही. दुष्काळी मदतीमध्ये शासनाद्वारा दुजाभाव केला जात असल्याने यवतमाळचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावेळी शासनाने ५० पैशांच्या आत पैसेवारी असणाऱ्या विदर्भातील ११ हजार ८३२ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील एक हजार ८७६ गावांचा समावेश होता. शासनाने केंद्राच्या ८ जून २०१५ च्या निकषाप्रमाणे मदत न देता विदर्भात कपाशी व सोयाबीन पिकांसाठी विमा योजनेची मंडळनिहाय आकडेवारी जाहीर केली.

जनधन खात्यात निधीअमरावती : त्यानंतर कपाशी व सोयाबीनचा विमा न उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मंडळनिहाय पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यात दोन लाख ३८ हजार ५१९ हेक्टरसाठी एक लाख ९५ हजार ८२१ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविलेला नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १०९ कोटी ३६ लाख रुपयांच्या मदतनिधीची मागणी नोंदविली. मंगळवारी जिल्हा प्रशासनाला हा निधी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून वितरित करण्यात येणार आहे. बँकेत खाते नसणाऱ्या शेतकऱ्यांना जन-धन योजनेमध्ये झिरो बॅलेन्स खाते उघडून त्याखात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सोयाबीनसाठी मिळणार १०८ कोटी ९७ लाख रुपये जिल्ह्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर १०९ कोटी ३६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १०८ कोटी ९६ लाख रुपये सोयाबीन नुकसानीसाठी आहेत तर कपाशीसाठी ३९ लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये अमरावती १३१९.८५ लाख, भातकुली १३०५.४४, नांदगाव १७५४.६८, धामणगाव रेल्वे ८६०.७४, चांदूररेल्वे ११९१.७८, तिवसा ७०८४.६६, मोर्शी ७११७.२८, वरुड ३७.९५, चांदूरबाजार २१४१.०३, अचलपूर ४०८५.०२, दर्यापूर ४२१.४०, अंजनगाव सुर्जी ६०१.४०, धारणी ७६९.९७ व चिखलदरा तालुक्यात ५१३.५४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आढावामदतीचे वाटप करण्यासाठी व वेळोवेळी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ समितीचे उपाध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) हे समितीचे सदस्य आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी हे समितीचे सचिव राहणार आहेत. ही समिती निधीवाटपाचे वेळापत्रक तयार करणार असून मदतवाटपाचा दर १५ दिवसांनी आढावा देखील घेणार आहे.