शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

दुष्काळाचे १०९ कोटी प्राप्त

By admin | Updated: January 11, 2017 00:09 IST

खरीप २०१५ मध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला.

शेतकऱ्यांना दिलासा : खरीप २०१५मधील कापूस, सोयाबीनचे नुकसानअमरावती : खरीप २०१५ मध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. यासाठी मदतीचे १०९ कोटी ३६ लाख रुपये मंगळवारी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. शासनाने सन २०१५ च्या दुष्काळी जिल्ह्यांची यादी घोषित केली. जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत असून सुद्धा जिल्ह्याचा दुष्काळयादीत समावेश नव्हता. तसेच एनडीआरएफच्या निकषान्वये शासनाने मदतही दिली नाही. दुष्काळी मदतीमध्ये शासनाद्वारा दुजाभाव केला जात असल्याने यवतमाळचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावेळी शासनाने ५० पैशांच्या आत पैसेवारी असणाऱ्या विदर्भातील ११ हजार ८३२ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील एक हजार ८७६ गावांचा समावेश होता. शासनाने केंद्राच्या ८ जून २०१५ च्या निकषाप्रमाणे मदत न देता विदर्भात कपाशी व सोयाबीन पिकांसाठी विमा योजनेची मंडळनिहाय आकडेवारी जाहीर केली.

जनधन खात्यात निधीअमरावती : त्यानंतर कपाशी व सोयाबीनचा विमा न उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मंडळनिहाय पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यात दोन लाख ३८ हजार ५१९ हेक्टरसाठी एक लाख ९५ हजार ८२१ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविलेला नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १०९ कोटी ३६ लाख रुपयांच्या मदतनिधीची मागणी नोंदविली. मंगळवारी जिल्हा प्रशासनाला हा निधी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून वितरित करण्यात येणार आहे. बँकेत खाते नसणाऱ्या शेतकऱ्यांना जन-धन योजनेमध्ये झिरो बॅलेन्स खाते उघडून त्याखात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सोयाबीनसाठी मिळणार १०८ कोटी ९७ लाख रुपये जिल्ह्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर १०९ कोटी ३६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १०८ कोटी ९६ लाख रुपये सोयाबीन नुकसानीसाठी आहेत तर कपाशीसाठी ३९ लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये अमरावती १३१९.८५ लाख, भातकुली १३०५.४४, नांदगाव १७५४.६८, धामणगाव रेल्वे ८६०.७४, चांदूररेल्वे ११९१.७८, तिवसा ७०८४.६६, मोर्शी ७११७.२८, वरुड ३७.९५, चांदूरबाजार २१४१.०३, अचलपूर ४०८५.०२, दर्यापूर ४२१.४०, अंजनगाव सुर्जी ६०१.४०, धारणी ७६९.९७ व चिखलदरा तालुक्यात ५१३.५४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आढावामदतीचे वाटप करण्यासाठी व वेळोवेळी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ समितीचे उपाध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) हे समितीचे सदस्य आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी हे समितीचे सचिव राहणार आहेत. ही समिती निधीवाटपाचे वेळापत्रक तयार करणार असून मदतवाटपाचा दर १५ दिवसांनी आढावा देखील घेणार आहे.