शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

'वॉटर कप' स्पर्धेसाठी मेळघाटातील आदिवासी बांधव सज्ज

By admin | Updated: February 20, 2017 00:11 IST

पानी फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते 'वॉटरकप' स्पर्धेत मेळघाटातील धारणी तालुका पहिल्यांदाच सहभागी होत असून...

अमरावती : पानी फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते 'वॉटरकप' स्पर्धेत मेळघाटातील धारणी तालुका पहिल्यांदाच सहभागी होत असून सध्या या तालुक्यातील विविध गावांतील आदिवासी बांधव प्रशिक्षण घेऊन यंदाच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.निसर्ग संरक्षण संस्थेच्या मेळघाट मधील हरिसालनजीक बोरी-कोठा रस्त्यालगत उभारलेल्या आदर्श अशा मुठवा समुदाय केंद्रात आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्यात आले. १६ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या शिबिरात १५ गावांमधून ५३ प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत. महाराष्ट्रातील पाणी टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने सिनेअभिनेते आमीर खान व किरण राव यांनी सत्यमेव जयतेचे डायरेक्टर सत्यजित भटकळ, रीना दत्ता यांच्या मदतीने स्थापन केलेल्या 'पानी फाउंडेशन' या संस्थेने मागील वर्षी महाराष्ट्रातील १० तालुक्यांत जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. यंदा वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी राज्यातील ३० तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. याद्वारे ३० हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये ही जलसंधारणाची लोक चळवळ राबविण्यात येत आहे. हरिसालनजीकच्या निसर्ग संरक्षण संस्थेच्या मुठ्वा केंद्रावर प्रशिक्षण शिबिरांमध्ये शनिवारी प्रशिक्षणार्थिनी समतल चर खोदून स्पर्धेत तांत्रिक दृष्ट्या अचूक कामे कशी करायची याचे प्रात्यक्षिक केले. प्रशिक्षणार्थी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणा सोबतच शिस्तीमध्ये, खेळीमेळीच्या वातावरणात अनेक उपयुक्त आणि नवनवीन गोष्टी शिकत आहेत. विविध गावांमधून आलेल्या आदिवासी बांधवांच्या एकमेकांशी नवीन ओळखी पण होत आहेत. प्रात:कालीन प्रार्थना, शिवार फेरी, पाणलोटा संबंधित वेगवेगळ्या फिल्म्स, त्यासंबंधित खेळ, श्रमदान असं सगळंच प्रशिक्षणार्थींना शिकायला आणि प्रत्यक्ष अनुभावायाला मिळत आहे.