शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धानोडी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे चावडी वाचन

By admin | Updated: January 11, 2015 22:43 IST

खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३०२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मदतीवाचून कोणताही

चांदूररेल्वे : खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३०२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मदतीवाचून कोणताही शेतकरी वंचित राहाणार नाही याची जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी चावडी वाचनप्रसंगी दिली. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीची सर्व ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना माहिती व्हावी, सर्व पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील १९८१ गावांत चावडी वाचन करण्यात येत आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील धनोडी या गावी चावडी वाचन उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती किशोर झाडे, उप विभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार एकबाल अहेमद, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शासनाकडून खरीप पिकासाठी हेक्टरी ४ हजार ५००, बागायतीसाठी ९ हजार रु.आणि फळबागांसाठी १२ हजार रुपये एक हेक्टरच्या मर्यादेत मदत वाटप करण्यात येत आहेत. ही रक्कम उद्या संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. मदत वाटपात दोष राहू नये, सर्वांना यादी पाहता यावी यासाठी ग्रामपंचायतमध्ये यादी लावण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक रकमेचा तपशील राहणार आहे. यात ज्यांचे नाव नाही किंवा चुकीने दुसऱ्याचे नाव आले आहे. क्षेत्र कमी जास्त आले आहे, अशांनी चुकांची दुरुस्तीसाठी तक्रार करावी. येत्या ७ दिवसांत तक्रारींचे निराकरण करुन वाटपातील चुका दुरुस्त करण्यात येतील. नुकत्याच पडलेल्या थंडीमुळेही पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त झळकले आहेत. त्याबाबतही शासनस्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे गित्ते यांनी सांगितले. हवामानातील बदलाची तसेच गारपीट, पावसाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, त्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये किंवा त्यांना पूर्वतयारी करता यावी, यासाठी कृषि विज्ञान केंद्राकडून प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घ्यावीत, केंव्हा पेरणी करावी, अशी उपयुक्त माहिती पुरविण्यात येणार आहे. यावेळी सभापती किशोर झाडे यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक स्वप्निल देशमुख यांनी केले.