शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अमरावती विद्यापीठात ३० हजार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन; ६१ लाख तिजोरीत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 20:27 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षा दिलेल्या ३० हजार ७०९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन झाले आहे.

ठळक मुद्दे२०१६ विद्यार्थ्यांनी मिळविली छायाप्रत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षा दिलेल्या ३० हजार ७०९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन झाले आहे. यापैकी ३८.०६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, हे विशेष.विद्यापीठात सेमिस्टर पॅटर्न लागू झाल्यामुळे उन्हाळी व हिवाळी असे वर्षातून दोन परीक्षा घेण्यात येतात. अभ्यासाचा ताण असल्यामुळे बरेच विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे पुनर्मूल्यांकनात वाढसुद्धा झाली आहे. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करणे, शुल्क भरणे आदी बाबी विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतात. सेमिस्टर पॅटर्नमुळे पुनर्मूल्यांकनाचे प्रमाण वाढीस लागले आहे. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. बरेचदा पेपर व्यवस्थित सोडविला तरी मूल्यांकन अचूक झाले नाही, तर विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केल्याशिवाय पर्याय नाही. प्रतिपेपर पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास किमान २०० रुपये शुल्क अदा करावे लागते. त्याअनुषंगाने दरवेळी परीक्षेत २५ ते ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी पुनर्मूल्याकनासाठी अर्ज करीत असल्याचे चित्र आहे. पुनर्मूल्यांकनात ३५ ते ४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याची आकडेवारी आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकनात दोष, त्रुटी कायम असल्याचे हे वास्तव दर्शविते. ३० हजार ७०९ पैकी ११ हजार ६८९ विद्यार्थ्यांची पूनर्मूल्यांकनानंतर गुणवाढ झाली. शुल्कापोटी ६१ लाख ४१ हजार रुपये विद्यापीठ तिजोरीत जमा झाले आहे.पुनर्मूल्यांकनासाठी विद्याशाखानिहाय नोंदणीकॉमर्स अँड मॅनेजमेंट- ५०९१ह्युमॅनिटीज- ३३७७इंटरडिसिप्लिनरी स्टडीज- १३६७सायन्स अँड टेक्नॉलॉजी- २०८७४पुनर्मूल्यांकनाची नियमावली आहे. त्यानुसार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जाते. २५ टक्क््यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्यास संबंधित परीक्षकांवर कायदेशीर कारवाई केली जाते.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र