शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

रवी राणांचे निर्विवाद वर्चस्व

By admin | Updated: December 1, 2015 01:29 IST

भातकुुली नगरपंचायतीसाठी यंदा प्रथमच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत युवास्वाभिमानच्या महानंदा पवार

सेनेला हादरा : नगराध्यक्षपदी महानंदा पवार, उपाध्यक्ष गिरीश कासटभातकुली : भातकुुली नगरपंचायतीसाठी यंदा प्रथमच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत युवास्वाभिमानच्या महानंदा पवार नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी गिरीश कासट यांची निवड करण्यात आली.१७ सदस्यीय नगरपंचायतमध्ये आ. रवी राणा यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसचे आठ नगरसेवक आहेत. दोन अपक्षही महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे स्वाभिमान काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या दहापर्यंत पोहचल्याने नगराध्यक्षपदी महानंदा पवार यांनी निवड निश्चित मानली जात होती. काँग्रेसकडे ४ नगरसेवक असून ३ नगरसेवक शिवसेनेकडे होते. सोमवारी नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भातकुलीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान महिलेला मिळाला. भातकुली नगर पंचायतीची निवडणूक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भातकुलीच्या नागरिकांनी युवा स्वाभिमानवर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही. राजकारण न करता विकासकामालाच प्राधान्य राहील. मतदारांनी टिकाकारांना मैदान दाखविले.- रवी राणा, आमदार, बडनेरा.आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीअमरावती : निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड आणि राणांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. अगदी खालच्या पातळीवर येऊन परस्परांवर बेछूट आरोप करण्यात आले. भाजपने तर प्रदेशध्यक्षांसह बड्यानेत्यांच्या प्रचारसभाही भातकुलीत लावल्या होत्या. तथापी शिवसेना भाजपचे राजकारण मोडीत निघाले आहे.