शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

'रतन इंडिया'ला जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 00:52 IST

रतन इंडिया कंपनीने बाधित शेतकऱ्यांच्या समस्या, प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांशी केला जाणारा अन्याय, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यांसह ..

अन्यथा कारवाई : ३१ मार्चपूर्वी समस्या निकाली काढा, एप्रिलनंतर दर आठवड्याला सुनावणीअमरावती : रतन इंडिया कंपनीने बाधित शेतकऱ्यांच्या समस्या, प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांशी केला जाणारा अन्याय, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यांसह अन्य समस्या ३१ मार्चच्या आत निकाली न काढल्यास यापुढे प्रत्येक आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, असा सज्जड दम जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी रतन इंडिया पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकरी, कर्मचारी, शिवकामगार सेनेचे पदाधिकारी व रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, पं.स. सभापती आशिष धर्माळे, रतन इंडिया कंपनीचे कर्नल लोकेशसिंग, एम.जी. सिंग, राकेश रणजीत, पंकज कुमार तसेच प्रकल्पग्रस्त प्रवीण मनोहर, चंडकापुरे, प्रफुल्ल तायडे, राजेश बारबुध्दे आदी उपस्थित होते. कंपनीतील हिंदी भाषिक अधिकारी इतर कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना दुजाभाव सहन करावा लागतो. त्यांना कमी वेतन दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ‘पीएफ’च्या नावाखाली २४ टक्के रकमेची कपात केली जात असली तरी कंपनीद्वारे दिला जाणारा १२ टक्के निधी मात्र यामध्ये जमा केला जात नाही, अशा प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे आदेश असतानासुध्दा अद्याप शेतीपिकांची नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतीच्या वहिवाटीसाठी दिलेले रस्ते ५ ते ८ फूट पाण्याखाली बुडाले आहेत अशा समस्यांचा पाढाच यावेळी प्रकल्पग्रस्तांनी वाचला. गित्ते यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांची नावे, वेतनाची यादी कंपनीकडून मागविण्याचे निर्देश कामगार आयुक्तांना दिलेत. प्रदूषणाबद्दल कंपनीला नोटीस बजावून तत्काळ अहवाल मागविला.कंपनी अ‍ॅक्टचे उल्लंघन झाल्यास कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणूक दिली जाईल आणि सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न होईल, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. यासंदर्भात रतन इंडिया कंपनीचे अधिकारी कर्नल लोकेशसिंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)