शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री बनण्यापेक्षा विरोधी पक्षनेता होईल

By admin | Updated: November 27, 2015 00:31 IST

अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतात, तर मी महाराष्ट्राच्या विरोधीपक्षनेतापदी विराजमान का होऊ शकत नाही,

गणेश देशमुख अमरावतीअरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतात, तर मी महाराष्ट्राच्या विरोधीपक्षनेतापदी विराजमान का होऊ शकत नाही, असा उत्स्फूर्त प्रश्न राजकीय प्रश्नांवर चुप्पी साधणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. 'लोकमत'ने घेतलेल्या मुलाखतीत अनेक मुद्यांवर ते सडेतोड बोलले. आमदार बच्चू कडू यांनी आठवडाभरापूर्वी भाला-कुराणी मोर्चा काढून अमरावती प्रशासनाला घामाघूम केले होते. प्रशासन-शासनाला नमते घेऊन त्यांच्या बहुअंशी मागण्या लागलीच मंजूरही कराव्या लागल्या, इतकी त्या मोर्चाची तीव्रता होती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बच्चू कडू यांनी काढलेला हा आक्रमक मोर्चा सत्तासमावेशाच्या हेतूने प्रेरित होता काय, या प्रश्नावर उसळून ते म्हणाले, लाल दिव्यात या बच्चूला ना कधी रस होता ना कधी तो राहणार. मंत्रिपदच घ्यायचे असते तर शिवसेना केव्हाही द्यायला तयार होती. आमचे नाते शेतकऱ्यांच्या वेदनांशी आहे. सोयाबीन पेरणीचाही खर्च निघाला नाही, पाण्याअभावी तुरीच्या शेंगा भरत नाहीत, कपाशीवर लाल्या आला, कधी नव्हे ती संत्री लबालब आलीत; पण खरेदीला व्यापारी फिरकेना. स्थिती अशी कमालिची बिकट असताना, विरोधक म्हणून घसा फाडून ओरडणारे भाजप-सेनेवाले आता सत्तेत येताच मूग गिळून बसले आहेत. कुणी लोकप्रतिनिधी लढायला पुढे येत नाहीत. शेतकरी रोज गळ्याभोवती फास आवळतो. अशा स्थितीत हा बच्चू चूप कसा बसेल? शेतकऱ्यांची मुले आम्ही. शेतकऱ्यांसाठी लढू, शेतकऱ्यांसाठी मरू. आणि आक्रमकतेचे तुम्ही विचारता- अहो, आज प्रतिकात्मक भाले आणले. प्रशासन-शासनाने शेतकऱ्यांना छळणे थांबविले नाही तर उद्या अधिकारी-सत्ताधिकाऱ्यांना भाल्याच्या टोकावर घ्यायलाही मागे बघणार नाही आम्ही! शेतकऱ्यांसाठी आम्ही आक्रमक होत आलो आहोत आणि होत राहणार आहोत. अपक्ष आमदारांच्या समुहात आपण नाहीत काय, या प्रश्नावर ते उत्तरले- नाही. मुळीच नाही. कळपाने राहणे मला आवडत नाही. हां, कळप जर सिंहांचा असेल तर नक्कीस सोबत करेन. अपक्ष आमदारांनी सोबत राहण्याची विनंती केली नव्हती काय, यावर बच्चू कडू सांगतात- केली होती ना. आम्ही विचारले त्यांना कशासाठी राहायचे एकजुटीने? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, सामान्यांच्या न्यायासाठीचा असेल उद्देश तर देऊ आम्ही साथ; पण उद्देशच सांगू शकले नाहीत ते आम्हाला. पुढची बातच रद्द. चांदूरबाजारच्या पालिका निवडणुकीत स्वकियांनीच त्यांच्याशी दगा केला. ती खपली काढली नि आक्रमक बच्चू कडू गंभीर झाले. म्हणाले, होय झाला आमचा पराभव. आम्ही स्वीकारतोही तो. पगारी नोकर असलेल्यांनी केवळ सत्तेच्या मोहापायी दगा केला. वाईट वाटते अशावेळी. आम्ही काय शिकवितो आणि असे लोक काय शिकतात? कार्यकर्ता सत्तेसाठी 'प्रहार' सोडत असेल तर मन जळतेच. संतापही येतो. कशासाठी करतो आहोत आपण हा अट्टाहास, असा सवालही मनाला भिडून जातो; पण पुन्हा आठवते ती रुग्णांची अव्याहत सेवा, शहिदांच्या गावची वारी, अपंगांच्या न्यायासाठीचा संघर्ष- मनावरची मळभ क्षणात झटकली जाते. उमेद तरारून उभी ठाकते. जुन्याच जोशाने आम्ही पुन्हा कामाला लागतो. हे असले एक-दोन भगोडे सेवाकार्याच्या अव्याहत यज्ञाला भेदू शकतात काय? छे! मुळीच नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचा आवाज सभागृहात पोहोचत नाही. ते बोलायला उभे राहतात त्यावेळी ३५ सदस्य सभागृहात असतात. ज्यांचा आवाज सभागृहातच पोहोचू शकत नाही त्यांचा आवाज राज्यभरात कसा पोहोचेल? सत्तेत असलेले भाजप सेनेवाले विरोधातच शोभतात. त्यांची भांडणे मनोरंजनाचा खेळ आहे. सत्ता चालविण्याइतपत प्रभाव त्यांचा निर्माण झालेला नाही. मुख्यमंत्री विरोधात असताना आक्रमक होते अन् प्रभाविही! मंत्रिमंडळाचे प्रमुख होताच ते निष्प्रभ झाले आहेत. राज्यभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोहोंच्या अशा विचित्र स्थितीने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी आम्ही आमच्या परीने पार पाडतो आहे. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांत असलेल्या प्रहारच्या शाखांना आम्ही तसे आवाहनच केले आहे. दाव्याने सांगतो, दिल्लीत रुग्णांची व्यवस्था करायची असेल तर, सारी यंत्रणा असूनही मुख्यमंत्री करू शकणार नाही, ती सर्व व्यवस्था आम्ही सत्तेबाहेर असून करू शकतो. आमची नाळच वेदनांशी जुळली आहे. 'सरफिऱ्यां'ची सारी फौजच उभी आहे अशा कामांसाठी. एकीकडे भाजपला तुम्ही दूषण देता आणि भाजप सरकारातच राज्यमंत्री असलेल्या प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात बरेचदा भेट देता. तुमचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत आहे. ना.पोटे त्यासाठीचा दुवा तर नव्हे ना? या प्रश्नावर बच्चू कडू जाम उसळले. मंत्रिपदासाठी पोटे यांची मदत घेण्याची गरज पडावी इतके वाईट दिवस आले नाहीत आमचे. अहो पुन्हा सांगतो, मंत्रिपद धावत येते आमच्याकडे. आम्ही फक्त इशारा द्यायची देरी आहे; पण नकोच आहे ना आम्हाला मंत्रिपद. राहिली गोष्ट प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात जाण्याची तर ते मंत्री होण्यापूर्वीपासून अन् भाजपक्षात जाण्यापूर्वीपासूनचे माझे मित्र आहेत. असतील ते पालकमंत्री. असतील भाजपात. आम्हाला काय त्याचे. मनात आले की जातो आम्ही त्यांना भेटायला.