शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरात ४३ लाखांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 22:31 IST

दर्यापूर तालुका मुख्यालयानजीक बाभळी टी-पॉर्इंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून एका ट्रकमधून तब्बल ४३ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू (२७ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा माल) जप्त केला.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : सिगारेटचाही समावेश, एफडीएची चमू दाखल

आॅनलाईन लोकमतअमरावती : दर्यापूर तालुका मुख्यालयानजीक बाभळी टी-पॉर्इंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून एका ट्रकमधून तब्बल ४३ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू (२७ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा माल) जप्त केला. हा माल दिल्लीहून अकोला येथे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.माहितीच्या आधारे दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी दर्यापूर-अंजनगाव मार्गावर नाकेबंदी करून वाहनांच्या तपासणी केली. ट्रक क्रमांक एचआर ३८ एक्स १२३६ ची तपासणी केली असता त्यात गुटख्याचे पोते दिसले. ट्रक जप्त करून ठाण्यात आणण्यात आला. ट्रकचालक राजू श्रीकृष्ण बघेल (२६) व अरुणसेन नथ्थासेन (२४,दोघेही रा. शिवपुरी मप्र.) यांना ताब्यात घेण्यात आले. माहितीवरून अन्न व औषधी प्रशानस विभागाचे अधिकारी राजेश यादव व विश्वजित शिंदे यांनी घटनास्थळ गाठून मालाची तपासणी केली. ट्रक पकडल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी ठाण्यात गर्दी केली. ट्रकमधील अन्य मालाची चौकशी व्हावी, अशी मागणी लावून धारली. त्यात एका सुगंधी सिगारेटचे पाकिटे आढळली. जप्त केलेला ट्रक गौरव चावला यांच्या मालकीचा आहे. वृत लिहिस्तोवर अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई सुरू होती.पोलिसांनी ट्रक व जप्त साहित्य असा ४३ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली. ही कारवाई ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली पीएसआय रिना कोरडे, शरद सारसे, रितेश राऊत, बजरंग इंगळे, नीलेश गावंडे, प्रशांत ढोके यांनी केली.असा मिळाला सिगारेटचा साठागुड्स गॅरेजच्या ट्रकमध्ये वस्तू होत्या. पोलिसांनी केवळ गुटख्याचे पोते बाहेर काढले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही गुटखा लपविल्याचा संशय व्यक्त करीत येथे जमलेल्या नागरिकांच्या आग्रहावरून इतर माल उघडायला लावला. यात पाच पोते सुगंधित सिगारेटचे बॉक्स आढळून आले. त्याची बिल्टीवरील किमंत १८ हजार आहे.पकडलेला माल गुटखा नसून तो पानमसाला व सुंगंधित तंबाखू आहे. पाच बॉक्स सुगंधित सिगरेटस् जप्त करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्यांच्या मालकांना परत केल्या जातील.- विश्वजित शिंदे,अन्न व औषधी प्रशासन विभाग, अमरावती