शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

दुप्पटीकरणाचा दर धोक्याच्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:01 IST

कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या उद्रेकाने २४ फेब्रुवारीला २६६, तर २५ ला १०५ दिवसांवर कालावधी

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी धोक्याच्या वळणावर आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारीला २६६ दिवसांवर असणारा ‘डबलिंगचा रेट’ २५ फेब्रुवारीला १६१ दिवसांनी कमी होऊन तो १०५ दिवसांवर आलेला आहे. अलीकडे रुग्णसंख्या वाढल्याने ९७ वर असणारा रिकव्हरी रेटदेखील माघारला आहे. सद्य:स्थितीत कोरोनामुक्तीचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्क्यांवर आल्याचे वास्तव आहे.कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे. त्यानुसार, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागला आहे. एका दिवसात तब्बल १६१ दिवसांनी कमी होणे म्हणजेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे द्योतक आहे.जिल्ह्यात एप्रिलमध्ये पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ३२६ दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारीला कोरोनाग्रस्तांची संख्या ३१,९२५ वर पोहोचली आहे. म्हणजेच, दरदिवशी सरासरी ९७.२२ कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख नोव्हेंबर व डिसेंबर महिने वगळता चढताच राहिला आहे. १६ मे रोजी म्हणजेच पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्याच्या ४२ दिवसांत १०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर, १३ दिवसांत म्हणजेच २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०२ झाली. त्यानंतर, १९ जूनला ४०६ व ११ जुलैला ८२१० वर पोहोचली. २४ जुलै रोजी १६०८ वर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. हा कालावधी केवळ १३ दिवसांचा होता. ११ ऑगस्ट रोजी ३२०९, ४ सप्टेंबर रोजी ६४०९ व २५ सप्टेंबर रोजी १२,२३३ पोहोचली होती. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संक्रमण कमी आल्याने ‘डबलिंग रेट’ माघारला व ३०० वर गेला होता. आता १ फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाचा धमाका सुरू झाल्याने हा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागल्याची धोक्याची घंटा आहे.

कोरोनाचा उद्रेक, रिकव्हरी रेट माघारलानोव्हेंबर २०२० पासून जिल्ह्यात संक्रमणमुक्त रुग्णांचे प्रमाण राज्यात अव्वल ९६ ते ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र, जानेवारीनंतर रुग्णसंख्या वाढायला लागली व फेब्रुवारी महिन्यात रोज कोरोनाचा उद्रेक होत असल्याने ‘रिकव्हरी रेट’ म्हणजेच एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५.३८ टक्क्यांवर पोहोचले असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

‘डबलिंग रेट’ नियोजनासाठी महत्त्वाचाकोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा प्रशासनासाठी फार महत्त्वाचा असतो. यासंदर्भात सातत्याने आढावा घेतला जाऊन नियोजन ठरविले जाते. कोरोना संसर्गामुळे किती दिवसांत किती रुग्ण वाढले, याचा अंदाज प्रशासनाला येऊन आवश्यक त्या उपाययोजना व सुविधांची निर्मिती केली जाते.  हॉस्पिटल, बेडसंख्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी यांचे नियोजन केले जाते.

रुग्णसंख्येत वाढ, मृत्युदरात कमीफेब्रुवारीच्या २५ दिवसांत १०,८५२ रुग्णांत वाढ झालेली आहे. त्यामुळे आता मृत्युदरात कमी आलेली आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये आठ टक्क्यांवर असणारा मृत्युदर नंतर कमी होत दोन टक्क्यांवर स्थिरावला होता. मध्यंतरी, काही पाॅइंटने वाढ झालेली होती. आता फेब्रुवारीच्या २४ दिवसांत ६३ रुग्णांची नोंद झाली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्याने मृत्युदर १.५१ टक्क्यांवर आलेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या