शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पटीकरणाचा दर धोक्याच्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:01 IST

कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या उद्रेकाने २४ फेब्रुवारीला २६६, तर २५ ला १०५ दिवसांवर कालावधी

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी धोक्याच्या वळणावर आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारीला २६६ दिवसांवर असणारा ‘डबलिंगचा रेट’ २५ फेब्रुवारीला १६१ दिवसांनी कमी होऊन तो १०५ दिवसांवर आलेला आहे. अलीकडे रुग्णसंख्या वाढल्याने ९७ वर असणारा रिकव्हरी रेटदेखील माघारला आहे. सद्य:स्थितीत कोरोनामुक्तीचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्क्यांवर आल्याचे वास्तव आहे.कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे. त्यानुसार, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागला आहे. एका दिवसात तब्बल १६१ दिवसांनी कमी होणे म्हणजेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे द्योतक आहे.जिल्ह्यात एप्रिलमध्ये पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ३२६ दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारीला कोरोनाग्रस्तांची संख्या ३१,९२५ वर पोहोचली आहे. म्हणजेच, दरदिवशी सरासरी ९७.२२ कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख नोव्हेंबर व डिसेंबर महिने वगळता चढताच राहिला आहे. १६ मे रोजी म्हणजेच पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्याच्या ४२ दिवसांत १०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर, १३ दिवसांत म्हणजेच २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०२ झाली. त्यानंतर, १९ जूनला ४०६ व ११ जुलैला ८२१० वर पोहोचली. २४ जुलै रोजी १६०८ वर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. हा कालावधी केवळ १३ दिवसांचा होता. ११ ऑगस्ट रोजी ३२०९, ४ सप्टेंबर रोजी ६४०९ व २५ सप्टेंबर रोजी १२,२३३ पोहोचली होती. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संक्रमण कमी आल्याने ‘डबलिंग रेट’ माघारला व ३०० वर गेला होता. आता १ फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाचा धमाका सुरू झाल्याने हा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागल्याची धोक्याची घंटा आहे.

कोरोनाचा उद्रेक, रिकव्हरी रेट माघारलानोव्हेंबर २०२० पासून जिल्ह्यात संक्रमणमुक्त रुग्णांचे प्रमाण राज्यात अव्वल ९६ ते ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र, जानेवारीनंतर रुग्णसंख्या वाढायला लागली व फेब्रुवारी महिन्यात रोज कोरोनाचा उद्रेक होत असल्याने ‘रिकव्हरी रेट’ म्हणजेच एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५.३८ टक्क्यांवर पोहोचले असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

‘डबलिंग रेट’ नियोजनासाठी महत्त्वाचाकोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा प्रशासनासाठी फार महत्त्वाचा असतो. यासंदर्भात सातत्याने आढावा घेतला जाऊन नियोजन ठरविले जाते. कोरोना संसर्गामुळे किती दिवसांत किती रुग्ण वाढले, याचा अंदाज प्रशासनाला येऊन आवश्यक त्या उपाययोजना व सुविधांची निर्मिती केली जाते.  हॉस्पिटल, बेडसंख्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी यांचे नियोजन केले जाते.

रुग्णसंख्येत वाढ, मृत्युदरात कमीफेब्रुवारीच्या २५ दिवसांत १०,८५२ रुग्णांत वाढ झालेली आहे. त्यामुळे आता मृत्युदरात कमी आलेली आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये आठ टक्क्यांवर असणारा मृत्युदर नंतर कमी होत दोन टक्क्यांवर स्थिरावला होता. मध्यंतरी, काही पाॅइंटने वाढ झालेली होती. आता फेब्रुवारीच्या २४ दिवसांत ६३ रुग्णांची नोंद झाली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्याने मृत्युदर १.५१ टक्क्यांवर आलेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या