शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दुप्पटीकरणाचा दर धोक्याच्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:01 IST

कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या उद्रेकाने २४ फेब्रुवारीला २६६, तर २५ ला १०५ दिवसांवर कालावधी

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी धोक्याच्या वळणावर आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारीला २६६ दिवसांवर असणारा ‘डबलिंगचा रेट’ २५ फेब्रुवारीला १६१ दिवसांनी कमी होऊन तो १०५ दिवसांवर आलेला आहे. अलीकडे रुग्णसंख्या वाढल्याने ९७ वर असणारा रिकव्हरी रेटदेखील माघारला आहे. सद्य:स्थितीत कोरोनामुक्तीचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्क्यांवर आल्याचे वास्तव आहे.कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे. त्यानुसार, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागला आहे. एका दिवसात तब्बल १६१ दिवसांनी कमी होणे म्हणजेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे द्योतक आहे.जिल्ह्यात एप्रिलमध्ये पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ३२६ दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारीला कोरोनाग्रस्तांची संख्या ३१,९२५ वर पोहोचली आहे. म्हणजेच, दरदिवशी सरासरी ९७.२२ कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख नोव्हेंबर व डिसेंबर महिने वगळता चढताच राहिला आहे. १६ मे रोजी म्हणजेच पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्याच्या ४२ दिवसांत १०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर, १३ दिवसांत म्हणजेच २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०२ झाली. त्यानंतर, १९ जूनला ४०६ व ११ जुलैला ८२१० वर पोहोचली. २४ जुलै रोजी १६०८ वर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. हा कालावधी केवळ १३ दिवसांचा होता. ११ ऑगस्ट रोजी ३२०९, ४ सप्टेंबर रोजी ६४०९ व २५ सप्टेंबर रोजी १२,२३३ पोहोचली होती. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संक्रमण कमी आल्याने ‘डबलिंग रेट’ माघारला व ३०० वर गेला होता. आता १ फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाचा धमाका सुरू झाल्याने हा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागल्याची धोक्याची घंटा आहे.

कोरोनाचा उद्रेक, रिकव्हरी रेट माघारलानोव्हेंबर २०२० पासून जिल्ह्यात संक्रमणमुक्त रुग्णांचे प्रमाण राज्यात अव्वल ९६ ते ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र, जानेवारीनंतर रुग्णसंख्या वाढायला लागली व फेब्रुवारी महिन्यात रोज कोरोनाचा उद्रेक होत असल्याने ‘रिकव्हरी रेट’ म्हणजेच एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५.३८ टक्क्यांवर पोहोचले असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

‘डबलिंग रेट’ नियोजनासाठी महत्त्वाचाकोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा प्रशासनासाठी फार महत्त्वाचा असतो. यासंदर्भात सातत्याने आढावा घेतला जाऊन नियोजन ठरविले जाते. कोरोना संसर्गामुळे किती दिवसांत किती रुग्ण वाढले, याचा अंदाज प्रशासनाला येऊन आवश्यक त्या उपाययोजना व सुविधांची निर्मिती केली जाते.  हॉस्पिटल, बेडसंख्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी यांचे नियोजन केले जाते.

रुग्णसंख्येत वाढ, मृत्युदरात कमीफेब्रुवारीच्या २५ दिवसांत १०,८५२ रुग्णांत वाढ झालेली आहे. त्यामुळे आता मृत्युदरात कमी आलेली आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये आठ टक्क्यांवर असणारा मृत्युदर नंतर कमी होत दोन टक्क्यांवर स्थिरावला होता. मध्यंतरी, काही पाॅइंटने वाढ झालेली होती. आता फेब्रुवारीच्या २४ दिवसांत ६३ रुग्णांची नोंद झाली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्याने मृत्युदर १.५१ टक्क्यांवर आलेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या