शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

आरसीसी पिलरमध्ये अपहार

By admin | Updated: January 4, 2017 00:22 IST

वनजमिनींच्या सीमा दर्शविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आरसीसी पिलर (सिमेंट, गिट्टी व लोखंडाचा वापर करुन तयार झालेले खांब) मध्ये लाखोंचा अपहार झाल्याची ...

निविदाविनाच कामे : वडाळी वनविभागाचा प्रताप, वरिष्ठांचे दुर्लक्ष अमरावती : वनजमिनींच्या सीमा दर्शविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आरसीसी पिलर (सिमेंट, गिट्टी व लोखंडाचा वापर करुन तयार झालेले खांब) मध्ये लाखोंचा अपहार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. निविदाविनाच कामे करुन वडाळी वनविभागाने अपहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. वनजमिनींवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षण कुं पण करताना वनांच्या सीमा निश्चितीसाठी आरसीसी पिलर लावण्याची नियमावली आहे. त्यानुसार सन २०१५ मध्ये वडाळी वनविभागाने जुने बायपास, वडाळी, वडरपुरा, पंचशीलनगर, आशियाना क्लब, वीटभट्टी परिसरात आरसीसी पिल्लर लावले आहे. मात्र हे आरसीसी पिल्लर लावताना अतिशय निकृष्ट दर्जाचे निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे हे पिल्लर वर्षभरात तुटू लागले आहेत. आरसीसी पिलर लावताना वनविभागाने नियमांना बगल दिली आहे. शासन निर्णयानुसार तीन लाखांच्यावरील कामे ही ई-निविदा प्रक्रि येद्वारे होणे अपेक्षित आहे. मात्र वडाळी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी मजूर लावून कामे केल्याचे देयके सादर करताना दर्शविले आहे. सुमारे ४०० आरसीसी पिलर लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र ६०० रुपये आरसीसी पिलर उभारणीसाठी लागले नसताना वडाळी वन परिक्षेत्राधिकाऱ्यांनी १२०० रुपये याप्रमाणे देयके काढण्याचा प्रताप तक्रारीत नमूद आहे. वनजमिनींच्या सीमा दर्शविताना आरसीसी पिलरचा दर्जा चांगला असावा, यासाठी वन परिक्षेत्राधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र आरएफओंनी वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करून निकृष्ट दर्जाचे आरसीसी पिल्लर लावण्याची किमया केली आहे. आदिवासी मजूर लावून पिल्लर उभारण्यात आल्याचा दावा वडाळी आरएफओ करीत असले तरी केवळ अपहारासाठी निकृष्ट साहित्य वापरुन आरसीसी पिलर लावल्याचे स्पष्ट होत आहे. देयकांची उचल करताना पिल्लरची साफसफाई व रंगविणे यात अपहार झाल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी) काय करतात सीसीएफ, डीएफओ, एसीएफ ? वडाळी हा परिसर शहरात असून दरदिवसाला वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची ये- जा सुरुच राहते. मात्र वनजमिनींच्या सीमा निश्चित करण्यासाठी अतिशय निकृष्ट दर्जाचे आरसीसी पिलर उभारण्यात आले असताना याकडे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षकांच्या लक्षात ही बाब येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वन्यजीव आणि वनांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असताना आर्थिक अपहाराचे प्रकरण घडत असले तरी हे वरिष्ठ वनाधिकारी नेमके काय करतात? हा प्रश्न अनुत्तरित आहे.