शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

पोलीस ठाण्यावर धडकला ग्रामस्थांचा मोर्चा

By admin | Updated: September 18, 2015 00:15 IST

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारी दूर कराव्यात, या मागणीसाठी नजीकच्या सामदा कासमपूर येथील ग्रामस्थांनी बुधवारी स्थानिक पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला.

गावकरी आक्रमक : निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हवाय न्यायदर्यापूर : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारी दूर कराव्यात, या मागणीसाठी नजीकच्या सामदा कासमपूर येथील ग्रामस्थांनी बुधवारी स्थानिक पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. संजय गांधी निराधार योजनेच्या येथील लाभार्थ्यांकडून माधव देवराव चोरपगार नामक इसम महिन्याकाठी २०० रूपयांची वसुली करीत असल्याबद्दल व शासनाच्या कामकाजात अडथळा निर्माण करीत असल्याबद्दल लाभार्थ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून तहसील व पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. यावेळी सरपंच प्रशांत तराळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोहर तराळ, पोलीस पाटील सुरेंद्र तराळ, बाळू धाडगे, प्रल्हाद कळस्कर, विजय चोरपगार व गावातील महिला आणि २०० ते २५० नागरिक उपस्थित होते. त्यांनी आ. रमेश बुंदिले, तहसीलदार राहूल तायडे यांना निवेदन देऊन मागणी केली.परिसरातील अनेक नागरिक शासनाच्या निराधार योजनांचा लाभ घेतात. त्यातल्या त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु या लाभार्थ्यांच्या अनुदानाबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. अनेकदा तर पात्र लाभार्थी असूनही त्यांची प्रकरणे मंजूर केली नाहीत. शिवाय मंजूर प्रकरणांचे अनुदानही महिनोन्महिने मिळत नाहीत. त्यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत. लाभार्थ्यांच्या या अडचणीचा फायद माधव देवराव चोरपगार नामक इसम घेत असल्याचे लाभार्थ्यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रकरण मंजूर करून देणे, अनुदान तातडीने मिळवून देणे आदी कारणे सांगून सदर इसम लाभार्थ्यांकडून प्रतीमहिना २०० रूपये वसूल करीत असल्याचे त्रस्त लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. सदर इसमावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी मोर्चाच्या माध्यमातून आमदार रमेश बुंदिले व तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले. निराधार नागरिकांचे जीणे सुकर व्हावे, यासाठी शासनाद्वारे निराधार योजना चालविल्या जातात. या योजनेचा आजमितीस अनेक लाभार्थी लाभ घेत आहेत. मात्र, योजनेतील अनियमिततेमुळे लाभार्थ्यांना बरेचदा त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने स्थानिक स्तरावर तातडीने उपायोयजना करून हप्तेवारी पैसे वसूल करणाऱ्यांवर अंकुश लावावा, अशी मागणीदेखील लाभार्थ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)