शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

पोलीस ठाण्यावर धडकला ग्रामस्थांचा मोर्चा

By admin | Updated: September 18, 2015 00:15 IST

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारी दूर कराव्यात, या मागणीसाठी नजीकच्या सामदा कासमपूर येथील ग्रामस्थांनी बुधवारी स्थानिक पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला.

गावकरी आक्रमक : निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हवाय न्यायदर्यापूर : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारी दूर कराव्यात, या मागणीसाठी नजीकच्या सामदा कासमपूर येथील ग्रामस्थांनी बुधवारी स्थानिक पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. संजय गांधी निराधार योजनेच्या येथील लाभार्थ्यांकडून माधव देवराव चोरपगार नामक इसम महिन्याकाठी २०० रूपयांची वसुली करीत असल्याबद्दल व शासनाच्या कामकाजात अडथळा निर्माण करीत असल्याबद्दल लाभार्थ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून तहसील व पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. यावेळी सरपंच प्रशांत तराळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोहर तराळ, पोलीस पाटील सुरेंद्र तराळ, बाळू धाडगे, प्रल्हाद कळस्कर, विजय चोरपगार व गावातील महिला आणि २०० ते २५० नागरिक उपस्थित होते. त्यांनी आ. रमेश बुंदिले, तहसीलदार राहूल तायडे यांना निवेदन देऊन मागणी केली.परिसरातील अनेक नागरिक शासनाच्या निराधार योजनांचा लाभ घेतात. त्यातल्या त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु या लाभार्थ्यांच्या अनुदानाबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. अनेकदा तर पात्र लाभार्थी असूनही त्यांची प्रकरणे मंजूर केली नाहीत. शिवाय मंजूर प्रकरणांचे अनुदानही महिनोन्महिने मिळत नाहीत. त्यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत. लाभार्थ्यांच्या या अडचणीचा फायद माधव देवराव चोरपगार नामक इसम घेत असल्याचे लाभार्थ्यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रकरण मंजूर करून देणे, अनुदान तातडीने मिळवून देणे आदी कारणे सांगून सदर इसम लाभार्थ्यांकडून प्रतीमहिना २०० रूपये वसूल करीत असल्याचे त्रस्त लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. सदर इसमावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी मोर्चाच्या माध्यमातून आमदार रमेश बुंदिले व तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले. निराधार नागरिकांचे जीणे सुकर व्हावे, यासाठी शासनाद्वारे निराधार योजना चालविल्या जातात. या योजनेचा आजमितीस अनेक लाभार्थी लाभ घेत आहेत. मात्र, योजनेतील अनियमिततेमुळे लाभार्थ्यांना बरेचदा त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने स्थानिक स्तरावर तातडीने उपायोयजना करून हप्तेवारी पैसे वसूल करणाऱ्यांवर अंकुश लावावा, अशी मागणीदेखील लाभार्थ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)