शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राजुराच्या मिरचीला परदेशात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:06 IST

पाण्याअभावी संत्राबागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मिरचीे या नगदी पिकाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्र्रमाणात असून, तिखट चवीच्या या मिरचीला विदेशात मागणी वाढली आहे. रात्रीतून चालणाऱ्या या एकमेव मिरची बाजारपेठेमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळत आहे.

ठळक मुद्देनगदी पीक : हजारो मजुरांना रोजगार देणारा मिरची बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पाण्याअभावी संत्राबागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मिरचीे या नगदी पिकाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्र्रमाणात असून, तिखट चवीच्या या मिरचीला विदेशात मागणी वाढली आहे. रात्रीतून चालणाऱ्या या एकमेव मिरची बाजारपेठेमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळत आहे.विदर्भाचा कॅलीफोर्निया असलेल्या वरुड तालुक्यात संत्रा पीक धोक्यात आल्याने शेतकºयांनी आता मिरचीकडे आगेकूच करीत मिरचीचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. शेकडो क्विंटल मिरची राजुरा येथील मिरची बाजारात येते. परंतु, कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकºयांना शक्य होत नाही. यामुळे मिळेल त्या भावात विकून शेतकरी मोकळे होतात. रात्री ३ वाजेपर्यंत मिरची देवाणघेवाण करणाºया राजुरा बाजारच्या बाजारपेठतून कोलकाता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्राबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, साऊदी अरब राष्ट्रासह आदी देशात येथील मिरचीला मागणी असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथे परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. बाजारामुळे उपहारगृहे, खानावळी, पानटपरी, चहाटपरीधारकांनाही रोजगार मिळतो. सायंकाळी ६ वाजता ही बाजारपेठ सुरू होते. बाजार समितीला मिळाणारा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. वाहतूकदारांनासुद्धा चांगली संधी मिळते. येथून परप्रांतात मिरची पाठवितांना मंडीमध्ये पोहचण्याचे वेळेचे बंधन असल्याने तीन ते चार हजार वाहतूक करणाऱ्या चालकाला बक्षिसापोटी व्यापाऱ्याकडून दिल्या जाते. अनेकांना काम देणारी बाजारपेठ आहे. एका दिवसाला बाराशे ते सोळाशे क्विंटलपर्यंत मिरचीची आवक या बाजारात असते.उत्पादकांना सुगीचे दिवसया बाजारपेठेत मिनिटागणिक मिरचीच्या भावात चढ-उतार होत असतो. मिरची लावण्यापासून तर मशागत आणि मिरची बाजारात नेईस्तोवर मिरची उत्पादकांना १० ते १२ रुपये प्रतिकिलोमागे खर्च येतो. त्यातुलनेत २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परदेशातील लोकांना तिखट चव देणारी राजुराबाजारची हिरची मिरची शेकडो हातांना काम देणारी ठरत असल्याने मिरची उतपदकांना सुगीचे दिवस आले आहे.शेतकऱ्यांना रोख रक्कममिरची बाजारामध्ये मिरची विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांना शेतमाल मोजल्यांनतर लगेचच रोखरक्कम दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत नाही. यावर्षी चांगले भाव मिळत असल्याने मिरची उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.