शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

राजुराच्या मिरचीला परदेशात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:06 IST

पाण्याअभावी संत्राबागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मिरचीे या नगदी पिकाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्र्रमाणात असून, तिखट चवीच्या या मिरचीला विदेशात मागणी वाढली आहे. रात्रीतून चालणाऱ्या या एकमेव मिरची बाजारपेठेमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळत आहे.

ठळक मुद्देनगदी पीक : हजारो मजुरांना रोजगार देणारा मिरची बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पाण्याअभावी संत्राबागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मिरचीे या नगदी पिकाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्र्रमाणात असून, तिखट चवीच्या या मिरचीला विदेशात मागणी वाढली आहे. रात्रीतून चालणाऱ्या या एकमेव मिरची बाजारपेठेमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळत आहे.विदर्भाचा कॅलीफोर्निया असलेल्या वरुड तालुक्यात संत्रा पीक धोक्यात आल्याने शेतकºयांनी आता मिरचीकडे आगेकूच करीत मिरचीचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. शेकडो क्विंटल मिरची राजुरा येथील मिरची बाजारात येते. परंतु, कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकºयांना शक्य होत नाही. यामुळे मिळेल त्या भावात विकून शेतकरी मोकळे होतात. रात्री ३ वाजेपर्यंत मिरची देवाणघेवाण करणाºया राजुरा बाजारच्या बाजारपेठतून कोलकाता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्राबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, साऊदी अरब राष्ट्रासह आदी देशात येथील मिरचीला मागणी असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथे परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. बाजारामुळे उपहारगृहे, खानावळी, पानटपरी, चहाटपरीधारकांनाही रोजगार मिळतो. सायंकाळी ६ वाजता ही बाजारपेठ सुरू होते. बाजार समितीला मिळाणारा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. वाहतूकदारांनासुद्धा चांगली संधी मिळते. येथून परप्रांतात मिरची पाठवितांना मंडीमध्ये पोहचण्याचे वेळेचे बंधन असल्याने तीन ते चार हजार वाहतूक करणाऱ्या चालकाला बक्षिसापोटी व्यापाऱ्याकडून दिल्या जाते. अनेकांना काम देणारी बाजारपेठ आहे. एका दिवसाला बाराशे ते सोळाशे क्विंटलपर्यंत मिरचीची आवक या बाजारात असते.उत्पादकांना सुगीचे दिवसया बाजारपेठेत मिनिटागणिक मिरचीच्या भावात चढ-उतार होत असतो. मिरची लावण्यापासून तर मशागत आणि मिरची बाजारात नेईस्तोवर मिरची उत्पादकांना १० ते १२ रुपये प्रतिकिलोमागे खर्च येतो. त्यातुलनेत २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परदेशातील लोकांना तिखट चव देणारी राजुराबाजारची हिरची मिरची शेकडो हातांना काम देणारी ठरत असल्याने मिरची उतपदकांना सुगीचे दिवस आले आहे.शेतकऱ्यांना रोख रक्कममिरची बाजारामध्ये मिरची विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांना शेतमाल मोजल्यांनतर लगेचच रोखरक्कम दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत नाही. यावर्षी चांगले भाव मिळत असल्याने मिरची उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.