शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:09 IST

परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला.

ठळक मुद्देपरदेशात मागणी : दर तेजीत, आवक नगण्य; हजारो कामगारांना फटका

सतीश बहुरुपी ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुराबाजार : परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला. त्यामुळे राजुराबाजार येथील प्रसिद्ध मिरची बाजारातील आवक ८७ टक्क््यांनी घटली आहे. व्यापाºयांकडून दर वाढविण्यात आले असले तरी उत्पादन घटल्याने शेतकºयांना त्याचा फायदा मिळविता आलेला नाही.कुणाच्या डोळयातून अश्रू तर कुणाच्या तोंडाला पाणी सोडणारी राजुराबाजारची हिरवी मिरची प्रसिद्ध आहे. बाजारात दररोज तीन हजार क्विंटल मिरचीची आवक होत असल्याची नोंद बाजार समितीने यापूर्वी घेतली आहे. तथापि, यंदा अल्प उत्पादनामुळे दररोज केवळ ४०० क्विंटल मिरची बाजारात विक्रीस येत आहे. दर २० ते २२ रुपये किलोप्रमाणे मिळत असताना शेतकºयांकडे मिरची नाही. यामुळे शेतकºयांचे हिरवे स्वप्न भंगले, तर व्यापारी आणि मजुरांनासुद्धा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे मिरची बाजारपेठेवर अवकळा पसरली आहे.अनेकांना मिळतो रोजगारराजुराबाजार येथील उपबाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ आहे. हंगामामध्ये दिवसागणीक २० ते २५ हजार रुपयांपर्यंत सेस बाजार समितीला मिळतो. येथून परप्रांतात मिरची पाठविताना वेळेचे बंधन असल्याने वाहतूकदारांना वाहनचालकांना बक्षिसाची संधी असते.रात्रीची बाजारपेठनाशंवत माल असल्याने मिळेल त्या भावात विकण्याची शेतकºयांची मानसिकता असते. राजुराबाजारची ही रात्रभराची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथून देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. पाकिस्तान, बांग्लादेश, अरब राष्ट्रांसह अनेक देशांमध्ये मिरची निर्यात होते.नगदी पीक म्हणून मिरची नावारूपास आली. परंतु, सतत तीन वर्षांपासून अज्ञात रोगामुळे उत्पादनात कमालीची घट येत आहे. यावर्षी दर तेजीत आहेत. पण, आवक कमी असल्याने शेतकºयांना फायदा नाही.- अनिल चांडक,मिरची व्यापारी