शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:09 IST

परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला.

ठळक मुद्देपरदेशात मागणी : दर तेजीत, आवक नगण्य; हजारो कामगारांना फटका

सतीश बहुरुपी ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुराबाजार : परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला. त्यामुळे राजुराबाजार येथील प्रसिद्ध मिरची बाजारातील आवक ८७ टक्क््यांनी घटली आहे. व्यापाºयांकडून दर वाढविण्यात आले असले तरी उत्पादन घटल्याने शेतकºयांना त्याचा फायदा मिळविता आलेला नाही.कुणाच्या डोळयातून अश्रू तर कुणाच्या तोंडाला पाणी सोडणारी राजुराबाजारची हिरवी मिरची प्रसिद्ध आहे. बाजारात दररोज तीन हजार क्विंटल मिरचीची आवक होत असल्याची नोंद बाजार समितीने यापूर्वी घेतली आहे. तथापि, यंदा अल्प उत्पादनामुळे दररोज केवळ ४०० क्विंटल मिरची बाजारात विक्रीस येत आहे. दर २० ते २२ रुपये किलोप्रमाणे मिळत असताना शेतकºयांकडे मिरची नाही. यामुळे शेतकºयांचे हिरवे स्वप्न भंगले, तर व्यापारी आणि मजुरांनासुद्धा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे मिरची बाजारपेठेवर अवकळा पसरली आहे.अनेकांना मिळतो रोजगारराजुराबाजार येथील उपबाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ आहे. हंगामामध्ये दिवसागणीक २० ते २५ हजार रुपयांपर्यंत सेस बाजार समितीला मिळतो. येथून परप्रांतात मिरची पाठविताना वेळेचे बंधन असल्याने वाहतूकदारांना वाहनचालकांना बक्षिसाची संधी असते.रात्रीची बाजारपेठनाशंवत माल असल्याने मिळेल त्या भावात विकण्याची शेतकºयांची मानसिकता असते. राजुराबाजारची ही रात्रभराची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथून देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. पाकिस्तान, बांग्लादेश, अरब राष्ट्रांसह अनेक देशांमध्ये मिरची निर्यात होते.नगदी पीक म्हणून मिरची नावारूपास आली. परंतु, सतत तीन वर्षांपासून अज्ञात रोगामुळे उत्पादनात कमालीची घट येत आहे. यावर्षी दर तेजीत आहेत. पण, आवक कमी असल्याने शेतकºयांना फायदा नाही.- अनिल चांडक,मिरची व्यापारी