शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

राजापेठ उड्डाण पुलाचे पाचव्यांदा भूमिपूजन !

By admin | Updated: December 27, 2015 00:38 IST

केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन होत आहे. आताही अमरावती महापालिकेची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाचव्यांदा भूमिपूजनाचा घाट ...

अमरावती : केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन होत आहे. आताही अमरावती महापालिकेची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाचव्यांदा भूमिपूजनाचा घाट रचला गेल्याचा आरोप कृती समितीचे मुन्ना राठोड आणि नितीन मोहोड यांनी केला आहे. मुन्ना राठोड आणि मोहोड यांनी खा. आनंदराव अडसुळांवर श्रेय लाटण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप शनिवारी पत्रपरिषदेतून केला आहे. उड्डाण पुलाबाबत संपूर्ण माहिती महापालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. उड्डाण पुलाचे काम सुरू झाले असताना भूमिपूजन कशाचे? आणि निधी कुठाय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाला विरोध नाही. मात्र ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी या उड्डाण पुलाचे पाचवे भूमिपूजन होत असल्याने रखडलेल्या उड्डाण पुलाचे अनुभव पाहता राजापेठ उड्डाण पूल किती वेळात पूर्ण होईल, याची डेडलाईन गडकरींनी अमरावतीकरांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उड्डाण पुलाच्या कामासाठी जो १० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला. या निधीवर कर्ज घेतल्याने कर्ज परतफेड होईपर्यंत ती १० कोटींची रक्कम पालिकेला वापरता किंवा काढता येणार नसल्याचे नितीन मोहोड यांनी सांगितले. अमरावती महापालिकेने या उड्डाण पुलाची लांबी, रुंदी आणि एकंदरीतच खर्चाचा ताळेबंद जनतेसमोर मांडावा. (प्रतिनिधी)