शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा ठिय्या जंंगलातच राजकुमार मानेना, प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 22:43 IST

शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुनर्वसन स्थळाहून पुन्हा व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास गेलेल्या सुमारे ७०० अदिवासींना जंगलाबाहेर काढण्याची सोमवारची मोहीम प्रशासनाला स्थगित करावी लागली.

ठळक मुद्देमुद्दा स्थलांतराचा : राणा म्हणाले, एसपींशी तू-तू,मैं-मैं; एसपींनी दिली हसून दाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुनर्वसन स्थळाहून पुन्हा व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास गेलेल्या सुमारे ७०० अदिवासींना जंगलाबाहेर काढण्याची सोमवारची मोहीम प्रशासनाला स्थगित करावी लागली. आदिवासींचे प्रभावी नेता राजकुमार पटेल यांची मनधरणी करण्यात अपयश आल्याने प्रशासनाला पाऊल मागे घ्यावे लागले.व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा खुर्द, सोमठाणा बुजरूक, धारगड, अमोना, केलपानी, गुल्लरघाट, नागरतास, बारूखेडा या आठ गावांतील आदिवासींना महत्प्रयासाने अकोट व तेल्हारा तालुक्यांतील पुनर्वसनस्थळी हलविले गेले होते. शासनाने तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे आदिवासी पुन्हा जंगलात परतले. तीन वर्षांतील या संपूर्ण घटनाक्रमात राजकुमार पटेल यांची मोठी मदत शासनाला वेळोवेळी झाली होती.याही वेळी आदिवासींना जंगलातून बाहेर आणण्याची 'जादू' केवळ पटेलच करू शकणार होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना तशी विनंती केली होती; तथापि पोलीस प्रशासनाने खारी प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या नातेवाइकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांनी ते गुन्हे मागे घ्यावे आणि मगच माझ्याकडून मदतीची अपेक्षा करावी, अशी स्पष्ट भूमिका पटेल यांनी घेतली. त्यासंबंधाने प्रशासनाकडून कुठलेही पाऊल न उचलले गेल्यामुळे पटेल मदतीसाठी पुढे आले नाही. आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचे सामर्थ्य प्रशासनात नसल्यामुळे ती मोहीम सोमवारी अखेर रद्द करण्यात आली.राणा म्हणाले, आदिवासींच्या मुद्यात एसपी नकारात्मकआमदार रवि राणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार यांची सोमवारी भेट घेतली. ‘लोकमत’शी बोलताना राणा म्हणाले, अदिवासींच्या मुद्यावर एसपी नकारात्मक आहेत. राजकुमार पटेल यांना सोबतीला घेण्याच्या मुद्दावरून एसपी आणि माझ्यात ‘तू-तू, मैं-मैं’ झाली. आदिवासींना बाहेर काढण्यासाठी पटेल यांना जुन्या गुन्ह्यांमध्ये अटक न करण्याचे आश्वासन द्या, तरच ते सोबत येतील. जंगलात कुडकुडणाºया आणि कधीही वाघाची शिकार ठरू शकणाºया आदिवासींना बाहेर काढण्यासाठी त्यांची मदत प्रशासनाला मिळू शकेल, असा आग्रह मी त्यांच्याकडे धरला. त्यांनी मात्र पटेलांना अटक करण्याची भाषा वापरली. अभिनाशकुमार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी हसून दाद दिली. बैठकीत कुठलाही तणाव निर्माण झाला नसल्याचेही ते म्हणाले.आदिवासी मरणाच्या दारात, पालकमंत्री बिनधास्तराणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. मेळघाटातील आदिवासी मरणाच्या दारात आहेत. ही संवेदनशील समस्या सोडविण्याऐवजी अन्य कामांमध्येच पालकमंत्र्यांचे लक्ष असते. या मुद्द्याची खरे तर त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. ते स्वत: सूत्रे हलवित आहेत. पालकमंत्री बेफिकीर आहेत, अशी तोफ राणा यांनी डागली.याद राखा, आदिवासींपैकी एकाचाही जीव गेला तर जिल्ह्याचे पालक या नात्याने पालकमंत्र्यांचीच ती प्रथम जबाबदारी असेल. घडू नये; पण असे घडलेच तर 'सदोष मनुष्यवधाच्या मुद्दा'वर आम्ही पोलीस तक्रार दाखल करू, असा खणखणीत इशारा देण्यासही राणा विसरले नाहीत.आज पोहोचणार जीआरआ. राणा म्हणाले, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशीही मी चर्चा केली. त्यानंतर फोनहून मुख्यमंत्र्यांशीही संपर्क साधला. जिल्हा पोलीस अधीक्षकांची अप्रिय वागणूक आणि आदिवासींचे होणारे हाल याबाबत त्यांना अवगत केले. आदिवासींच्या आठ गावांसाठी कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयाचे परिपत्रक मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.वनखात्याचा हा मुद्दा आहे. त्यांना गरज पडेल त्यावेळी योग्य पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. बैठकीदरम्यान आमदार राणा यांच्याशी 'तू-तू, मै-मैं' झाली नाही.- अभिनाशकुमारजिल्हा पोलीस अधीक्षक अमरावतीयासंबंधाने काल बैठक झाली. मुद्द्यांवर चर्चा झाली. पोलिसांचे काम सुरक्षा पुरविणे आहे. ती नक्कीच पुरवू. कायद्याच्या चौकटीत न बसणारे इतर काही मुद्दे 'आॅफिशियली' करता येणे शक्य नाहीत.- सी.एच.वाकडेविशेष पोलीस महानिरीक्षकअमरावती परिक्षेत्र.मुख्यमंत्र्यांनी ११ डिसेंबरला मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींना दिले होते. सदर विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, त्यासंबंधीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल.- अभिजित बांगर,जिल्हाधिकारी, अमरावती.