शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

‘कोरोना’मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST

जिल्हाधिकारी : माहिती सादर करण्याचे टास्क फोर्सला निर्देश अमरावती : कोरोना विषाणूमुळे अनेक मुलांनी आई-वडील गमावले आहेत. अशा मुलांची ...

जिल्हाधिकारी : माहिती सादर करण्याचे टास्क फोर्सला निर्देश

अमरावती : कोरोना विषाणूमुळे अनेक मुलांनी आई-वडील गमावले आहेत. अशा मुलांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांच्या यथायोग्य संगोपनासाठी जिल्ह्यात कृती दल गठित करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची माहिती आरोग्य यंत्रणेने व कृती दलाने तातडीने जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोविड-१९’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड १९ ’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील मुलांना तसेच ‘कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना व्हाव्यात म्हणून कृती दल गठित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकाचा फलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत बालगृहे, निरीक्षणगृहातील मुलांसाठी तात्काळ स्वतंत्र वैद्यकीय पथक गठित करावे. या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पोलीस दलाने सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. अशी मुले शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार, तस्करीसारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत, याचीही दक्षता पोलिस दलाने घ्यावयाची आहे, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. बाल संगोपन योजनेंतर्गत त्यांचा ताबा नातेवाइकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी जिल्हा बालकल्याण समितीने करावी तसेच कृती दलाची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करावी, अशाही सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी बालगृहांचा आढावा घेतला.

दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी संपर्क यंत्रणा :

ज्या मुलांच्या दोन्ही पालकांना कोविड-१९ आजाराचा संसर्ग झाला आहे, त्यांची किंवा कुठली समस्या उद्भवल्यास तातडीने माहिती चाईल्ड लाईन क्रमांक १०९८ , जिल्हा कृती दल समन्वयक (९०२१३५८८१६), बाल कल्याण समिती, हेल्प लाईन क्रमांकावर द्यावी. अशा अनाथ झालेल्या मुलांची व्यवस्था ही महिला व बाल विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय मुलींचे निरीक्षणगृह/ बालगृह (देसाई लेआऊट, अमरावती), शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह (विजय काॅलनी, अमरावती) व होलिक्रॉस होम फॉर बेबीज (कॅम्प रोड) येथे करण्यात येईल. संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने मुलांच्या पालकांना किंवा नातेवाइकांना ही माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले आहेत.