शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लवकरच बरसणार पावसाच्या सरी!

By admin | Updated: July 5, 2014 00:24 IST

जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने जनमानस हैराण झाले आहे.

अमरावती : जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने जनमानस हैराण झाले आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असतानाच हवामान खात्याने मात्र खुशखबर दिली असून येत्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शनिवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात होऊ शकते. जुलै महिन्यात सरासरी पर्जन्यमान राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.यंदा उन्हाळ्यातील तापमानाने ४६ डीग्री सेल्सिअसपर्यंत उच्चांक गाठला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे यंदा पर्जन्यमानही चांगलेच राहील, असा सगळ्यांचा कयास होता. मात्र, यंदा पावसाची सरासरी कमी राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. नाही म्हणायला जून महिन्यात काही दिवस ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या आगमनाची चाहुल लागली होती. मध्यंतरी तुरळक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिली. आता मात्र महाराष्ट्र ते केरळ व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शनिवारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस कमी-अधिक असू शकतो.