शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

राजकमल चौकातील मुख्य मार्केटमध्ये शिरले पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

अमरावती : शहराला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे शहरात सर्व रस्त्यावर तसेच खोलगट भागात असेलेले अनेक मार्केटमध्ये पाणीच -पाणी ...

अमरावती : शहराला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे शहरात सर्व रस्त्यावर तसेच खोलगट भागात असेलेले अनेक मार्केटमध्ये पाणीच -पाणी होते. राजकमल चौकातील मुख्य मार्केटमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने यामध्ये अनेक व्यावसायिकांचे किरकोळ नुकसान झाले. गुरुवारी सकाळपर्यंत पावसाचे पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहरात अनेक मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट काँक्रेटिकरणाचे रस्ते बांधले. मात्र, अनेक मोठ्या नाल्यांचे कामे प्रलंबित आहे. तसेच महापालिकेनेसुद्धा पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ व कचरा काढायला हवा होता तो काढला नाही. त्यामुळे नाल्या ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता ज्या ठिकाणी खोलगट भागात मार्केट आहेत त्यात ते पाणी शिरले. त्यामुळे राजकमल चौकातील मुख्य मार्केटमधील मोेबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकाने, आईस्क्रीम सेंटर तसेच अनेक व्यावसायिकांना गुरुवारी दुपारपर्यंत दुकाने उघडण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यांनी फिर्याद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नोंदविली. मात्र, नाल्यांची कामे झाल्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली हे विशेष! नालीचे कामे करताना काही डीबी बॉक्स काढून ते दुसरीकडे हलविणे गरजेचे होते. तसेच पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाने महावितरणला दिले मात्र डीबी बॉक्स न काढल्याने बांधकाम विभागाला मुख्य नाली जोडता आली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी मार्केटमध्ये शिरल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.