शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

मुंबईकडून येणारा पाऊस इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:20 IST

अरबी समुद्रावरून वाहणारे वारे अत्यंत कमी बाष्प आणत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींमुळे विदर्भात पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात काही घडामोडी नसल्याने विदर्भात मुंबईकडून येणारा पाऊस आता इतिहासजमा झाल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जिल्ह्यात पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अरबी समुद्रावरून वाहणारे वारे अत्यंत कमी बाष्प आणत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींमुळे विदर्भात पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात काही घडामोडी नसल्याने विदर्भात मुंबईकडून येणारा पाऊस आता इतिहासजमा झाल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अरबी समुद्रात असलेल्या हवामानशास्त्रीय घडामोडीमुळे कमी दाबाचे क्षेत्र, किनारपट्टीवर असलेली कमी दाबाची द्रोणीय स्थिती, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेले चक्रीय वारे यामुळे जून महिन्यात विदर्भात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यानंतर मात्र किरकोळ प्रमाणात असलेली द्रोणीय स्थिती आणि अन्य घटकांचा अभाव यामुळे नैऋत्य मान्सूनद्वारे होणारा ढगांचा पुरवठा कमी असल्यामुळे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र कोरडा राहिल्याचे वास्तव आहे.मागील दोन महिन्यात विदर्भात जो काही हलका ते मध्यम पाऊस पडला, तो बंगालच्या उपसागरात तीन ते चार वेळा तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, त्याचे डिप्रेशनमध्ये होणारे रूपांतर आणि वायव्य दिशेने पुढे सरकत जाणे व संबंधित चक्राकार वाऱ्यामुळेच झाला. वायव्य बंगालचा उपसागर किंवा ओरीसा किनारपट्टी अथवा आंध्र किनारपट्टी यावरील चक्राकार वाºयामुळे विदर्भावर मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणले जाते. यामुळे पूर्व विदर्भ, नागपूर व वर्धा भागात बºयापैकी पाऊस होतो. परंतु हेच ढग ज्यावेळी अमरावती, अकोल्याच्या आसपास येतात, त्यावेळी पश्चिमेकडून येणारे नैऋत्य मोसमी वारे या ढगांना उत्तरेकडे ढकलतात. परिणामी अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानासुद्धा रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.आठवडाभर पावसाची हीच स्थिती कायममान्सूनची पश्चिम धुरी उत्तरेकडे सरकली असल्याने हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. विदर्भावर सक्रिय जोडक्षेत्रसुद्धा पश्चिमेकडे सरकल्यामुळे मान्सूनची सक्रियता सध्या कमी झालेली आहे. बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे मान्सून कमकुवत झालेला आहे. उत्तर छत्तीसगढच्या तीन ते सहा किमी उंचीवर तसेच गुजरात, कोकणवर पाच ते आठ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भावर ढग जमा होत आहे. मात्र, अन्य परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे सध्या पावसाची शक्यता नाही. विदर्भात पावसाची ही स्थिती आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.जिल्ह्यात १ जून ते १ सप्टेंबर या कालावधित ६४८ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही ८४ टक्केवारी आहे. पावसाचे ९० दिवस झाले असताना जिल्ह्यातील नांदगाव, चांदूर रेल्वे व दर्यापूर वगळता उर्वरीत ११ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहे.