शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

मुंबईकडून येणारा पाऊस इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:20 IST

अरबी समुद्रावरून वाहणारे वारे अत्यंत कमी बाष्प आणत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींमुळे विदर्भात पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात काही घडामोडी नसल्याने विदर्भात मुंबईकडून येणारा पाऊस आता इतिहासजमा झाल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जिल्ह्यात पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अरबी समुद्रावरून वाहणारे वारे अत्यंत कमी बाष्प आणत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींमुळे विदर्भात पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात काही घडामोडी नसल्याने विदर्भात मुंबईकडून येणारा पाऊस आता इतिहासजमा झाल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अरबी समुद्रात असलेल्या हवामानशास्त्रीय घडामोडीमुळे कमी दाबाचे क्षेत्र, किनारपट्टीवर असलेली कमी दाबाची द्रोणीय स्थिती, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेले चक्रीय वारे यामुळे जून महिन्यात विदर्भात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यानंतर मात्र किरकोळ प्रमाणात असलेली द्रोणीय स्थिती आणि अन्य घटकांचा अभाव यामुळे नैऋत्य मान्सूनद्वारे होणारा ढगांचा पुरवठा कमी असल्यामुळे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र कोरडा राहिल्याचे वास्तव आहे.मागील दोन महिन्यात विदर्भात जो काही हलका ते मध्यम पाऊस पडला, तो बंगालच्या उपसागरात तीन ते चार वेळा तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, त्याचे डिप्रेशनमध्ये होणारे रूपांतर आणि वायव्य दिशेने पुढे सरकत जाणे व संबंधित चक्राकार वाऱ्यामुळेच झाला. वायव्य बंगालचा उपसागर किंवा ओरीसा किनारपट्टी अथवा आंध्र किनारपट्टी यावरील चक्राकार वाºयामुळे विदर्भावर मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणले जाते. यामुळे पूर्व विदर्भ, नागपूर व वर्धा भागात बºयापैकी पाऊस होतो. परंतु हेच ढग ज्यावेळी अमरावती, अकोल्याच्या आसपास येतात, त्यावेळी पश्चिमेकडून येणारे नैऋत्य मोसमी वारे या ढगांना उत्तरेकडे ढकलतात. परिणामी अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानासुद्धा रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.आठवडाभर पावसाची हीच स्थिती कायममान्सूनची पश्चिम धुरी उत्तरेकडे सरकली असल्याने हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. विदर्भावर सक्रिय जोडक्षेत्रसुद्धा पश्चिमेकडे सरकल्यामुळे मान्सूनची सक्रियता सध्या कमी झालेली आहे. बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे मान्सून कमकुवत झालेला आहे. उत्तर छत्तीसगढच्या तीन ते सहा किमी उंचीवर तसेच गुजरात, कोकणवर पाच ते आठ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भावर ढग जमा होत आहे. मात्र, अन्य परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे सध्या पावसाची शक्यता नाही. विदर्भात पावसाची ही स्थिती आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.जिल्ह्यात १ जून ते १ सप्टेंबर या कालावधित ६४८ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही ८४ टक्केवारी आहे. पावसाचे ९० दिवस झाले असताना जिल्ह्यातील नांदगाव, चांदूर रेल्वे व दर्यापूर वगळता उर्वरीत ११ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहे.