शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

अस्मानी संकटात सुल्तानी घोषणांचा पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST

गजानन चोपडे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे परवा अमरावतीत होते. गेल्या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या कास्तकाराच्या तक्रारींची दखल ...

गजानन चोपडे

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे परवा अमरावतीत होते. गेल्या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या कास्तकाराच्या तक्रारींची दखल न घेण्यात आल्याने कृषिमंत्री जाम संतापले. थेट पीक विमा कंपनी कार्यालयाची झाडाझडती घेतली. कुणीही विमा कंपनीवाल्यांना पाठीशी घालू नये, घातल्यास त्याच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशारा खुद्द कृषिमंत्र्यांनीच दिल्यानंतर रविवारी रात्री उशिरा विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कदाचित राज्यातील यावर्षीची ही पहिली कारवाई असावी. पहिली यासाठी की, आजवर कास्तकार विमा कंपनीच्या तक्रारी घेऊन शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवायचे. कृषिमंत्र्यांनी दम दिल्यानंतर यंदा पहिल्यांदा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यानेच कंपनीविरुद्ध पोलिसात धाव घेतली. कितीही आर्जव केली तरी सुनावणी होत नसल्याने पुरता खचलेला कास्तकार कृषिमंत्र्यांच्या ‘ॲक्शन मोड’मुळे काहीसा सुखावला, हे बरे झाले. शासकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच या विमा कंपन्या गब्बर झाल्या आहेत. गेल्या वर्षी १ लाख ८५ हजार कास्तकारांनी पीक विम्यापोटी तब्बल १०९ कोटी रुपये कंपन्यांच्या घशात टाकले. केंद्र आणि राज्य शासनाचा वाटा पकडून हा आकडा ३५० कोटींच्या घरात जातो. जिल्ह्याची आणेवारी ४३ पैसे असून दुष्काळसदृश स्थिती असल्याचा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल होता. असे असताना फक्त ६२ कोटी रुपयांचे वाटप विमा कंपन्यांकडून करण्यात आले. अर्थात केवळ २७ टक्के कास्तकार वगळता इतरांच्या तोंडाला पाने पुसली गेली. ढग ‘सरसकट’ दाटून येतात; पण ‘तत्त्वत:’ पाऊस पाडून शेती उत्थानाच्या निकषांची पार वाट लावून जातात. सरकारी भाषेत सांगायचे झाल्यास, सध्या कास्तकाराची हीच अवस्था झाली आहे. अतिवृष्टीने पार कंबरडे मोडले असताना पीक विमा कंपन्यांची मुजोरी सहन करण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नसतो. तक्रारीसाठी एखादा पुढे आला तरी नको ती बिलामत म्हणून इतर त्याला रोखतात. नेमका याचाच फायदा घेत विमा कंपन्या कास्तकाराचीच ‘सुपारी’ घेण्याचे धाडस दाखवित आहे. गेल्या सहा महिन्यात अमरावती विभागात ४६१ कास्तकारांनी विषाचा घोट घेतला. कास्तकार संघटित नाही, तो आंदोलन करत नाही, मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषाही तो वापरत नाही, तो फक्त विषाचे दोन घोट घेत जगाचा निरोप घेतो. म्हणून तर ‘चाय पे चर्चा’ होते, विषाची चर्चा कधीच होत नाही. लाखाहून अधिक शेतकरी सावकाराच्या दारात आहेत.

मागील पाच दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. अनेकांचा संसार उद्‌ध्वस्त झाला. अख्खे शेत पाण्याखाली गेले. होत्याचे नव्हते झाले. लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकलेल्या कास्तकाराला तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्याची ‘सुल्तानी’ घोषणा केली. या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, त्यांचा हा दौरा नुसता ‘फोटो सेशन’चा इव्हेंट ठरू नये, अशी अपेक्षा कास्तकार करीत असेल तर त्याचे चुकले तरी कुठे..!