शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पुनरागमन; दोन महिन्यांनंतर मेळघाटच्या नदी नाल्यांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:52 IST

मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटवासीयांना गणरायांच्या आगमनासोबतच पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला.

ठळक मुद्दे-मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटवासीयांना गणरायांच्या आगमनासोबतच पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला.तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मेळघाटातील नदी-नाले वाहू लागले आहेत.

धारणी, दि. 26-मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटवासीयांना गणरायांच्या आगमनासोबतच पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मेळघाटातील नदी-नाले वाहू लागले आहेत.अमरावती विभागात दरवर्षी सर्वाधिक पाऊस मेळघाटात होतो. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे नदी नाले ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कोरडेच होते. यामुळे शेतकऱ्यांमध्येदेखील चिंतेचे वातावरण होते. काही शेतकऱ्यांनी ओलीत करण्यास सुरुवात केली होती. यंदा दुष्काळाचे सावट परसणार का, अशी चिंता लागली असतानाच गणरायाच्या आगमणासोबतच पावसाने दमदार हजेरी लावल्याने मेळघाटात आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय मेळघाटात असलेल्या प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील तापी, सिपना, गडगा, मधवा व अलई या नदी-नाल्यांना पाणी आले आहे. 

पावसाच्या पुनरागमनाने धारणी तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली असून खरीप हंगाम वाया जाणार नाही, अशी उमेद शेतकऱ्यांमध्ये आहे. हा पाऊस किमान १५ दिवस राहिल्यास जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, असा अंदाज स्थानिक लावत आहेत. तूर्तास पाण्याचे दुर्भिक्ष संपले असले तरी रबी हंगामासाठी दमदार पाऊस पडायलाच हवा, असे मत व्यक्त केले जात आहे