धामणगाव रेल्वे : निर्सगाच्या बदलत्या चक्राने मागील आठ वर्षा पासून जून महिन्यात पाऊस बळीराजाला हुलकावणी देत असून दरवर्षी लेटकमर म्हणून पावसाची नोंद होते़ परिणामी दरवेळी उशीरा पडणाऱ्या पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट होते तर दरवेळी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्याजाचा फटका बसतो़निर्सगाचे ऋुतूचक्र या संगणक युगात पूर्णत: बदलले आहे़ उन्हाळ्यात पाऊस तर पावसाळ्यात उन्हाचे चटके बसतात़ हिवाळ्यात पाऊस तर पावसाळ्यात थंडी अनुभवायला मिळते़ मानवाच्या या आधुनिक शोधचक्रात निर्सगाची पत्ते अद्यापही मानवाला मांडता आली नाही़ दरवेळी पावसाळ्यात वृक्ष लागवड होते़ परंतू वर्षभरात या वृक्षाची वाढ झालेली दिसत नाही़ विशेषत: लावलेल्या झाडापेक्षा कटाई केलेल्या झाडांची संख्या चार पटीने असते़ त्याचा परिणाम आता सर्वांनाच सोसावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे़ सन २००७ मध्ये मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी हजेरी लावली नंतर बेपत्ता झाला तर शेवटच्या आठवड्यात दोन दिवस पाऊस पडला सन २००८ मध्ये मृग नक्षत्र कोरडा गेल्याची नोंद महसुल दप्तरी आहे़ सन २००९ मध्ये मृग नक्षत्राच्या पूर्वी रोहीनी बरसल्या पण मृगाचा लाल किडा या मृग नक्षत्रात पहायला मिळाला नाही़ हीच स्थिती सन २०१० मध्ये होती़ सन २०११ मध्ये पावसाने ठरलेल्या वेळी हजेरी लावली पण कमीअधीक पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची मोठी नासाडी झाली़ सन २०१२ मध्ये ठरलेल्या वेळी येणाऱ्या पावसाने जून च्या पहिल्या आठवड्यात हुलकावणी दिली़ सन २०१३ मध्ये पहिला व दुसरा आठवडा पाऊस पडला परंतू काही भागात हजेरी तर काही भागात गैरहजेरी अशी पावसाची नोंद झाली़ (तालुका प्रतिनिधी)
आठ वर्षांपासून पाऊस ‘लेटकमर’
By admin | Updated: June 17, 2014 23:58 IST