शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पाऊस गायब, उन्हाचा तडाख्याने पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:16 IST

फोटो - सिंगल सोयाबीन चांदूर बाजार : जून-जुलै मधील पावसाच्या २० दिवसानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाला. ...

फोटो - सिंगल सोयाबीन

चांदूर बाजार : जून-जुलै मधील पावसाच्या २० दिवसानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे बाल्यावस्थेतील खरीप पिकांची जोमात वाढ झाली. कापूस व सोयाबीन ही मुख्य पिके फुलोरा अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची जास्त गरज असते. परंतु, गत १५ दिवसांपासून तालुक्यात पाऊस नाही. सध्या तालुक्यात पाऊस गायब आणि उन्हाचा तडाखा अधिक असल्याने पुन्हा एकदा खरिपातील पिके संकटात सापडली आहे.

तालुक्यात १५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे त्याचा फटका पेरणी झालेल्या ४२ हजार हेक्टरवरील पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पंधरा दिवसांच्या पावसाच्या मोठ्या खंडाने १४ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर पावसाच्या मोठ्या खंडाने खोडकिडीसोबतच मूळकुज, खोडकुज,येलो व्हायरस, ग्रीन व्हायरस या रोगाचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आजच सोयाबीनची उत्पादकता ५० टक्क्यांनी घटणार, हे स्पष्ट दिसत आहे.

कपाशी,तूर व ज्वारी यांची वाढ खुंटली आहे. अशातच पावसाच्या खंडाने या पिकांवर विविध रोग-किडींचे आक्रमण झाले आहे. कपाशीवर गुलाबी बोंडअळीने ऑगस्ट महिन्यातच आपले बस्तान मांडले. मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचेही प्रमाण वाढले आहे. इतर किडींपेक्षा गुलाबी बोंड अळी ही कापसाला जास्त धोकादायक आहे. तूर या पिकांची सध्याची अवस्था ही फुटवे करण्याची आहे. पावसाच्या ताणामुळे फुटव्यासह तुरीच्या पिकाचीही वाढ खुंटली आहे. इतरही पिकांची अवस्था दयनीय आहे. येत्या चार ते पाच दिवसात पाऊस न आल्यास तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था अधिकच भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

----------------------------

सोयाबीन पिकाला फुलोरा ते शेंगा धरण्याचे अवस्थेत पावसाची सर्वांत जास्त आवश्यकता असते. याशिवाय अलीकडे सोयाबीनचे लवकर तयार होणारे वाण पेरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे या पावसाच्या मोठ्या खंडाचा फटका सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या जातींना बसणार आहे.

- डॉ. समीर जोशी, बेलोरा, ता. चांदूर बाजार

------------

आणखी कोट येत आहे.