शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे थांबणार रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:39 IST

महानुभावपंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर या गावात दोनशेच्या जवळपास तीर्थस्थान आहेत. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून येणारे लाखो भक्त रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे नरखेड पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा श्रीक्षेत्र रिद्धपूर प्लॅटफॉर्मवर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामपंचायत व ग्रामवासीयांच्यावतीने येथील प्लॅपफार्मवर श्रीमद् भगवत गीता शांतीपाठ गायन करून शांततेत रेल रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देश्रीमद् भगवद्गीता शांतीपाठ गायन : रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी/रिद्धपूर : महानुभावपंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर या गावात दोनशेच्या जवळपास तीर्थस्थान आहेत. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून येणारे लाखो भक्त रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे नरखेड पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा श्रीक्षेत्र रिद्धपूर प्लॅटफॉर्मवर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामपंचायत व ग्रामवासीयांच्यावतीने येथील प्लॅपफार्मवर श्रीमद् भगवत गीता शांतीपाठ गायन करून शांततेत रेल रोको आंदोलन करण्यात आले.रिद्धपूर येथील शेतकऱ्यांना शेतमाल मोठ्या शहरात विकण्यास नेण्यासाठी रेल्वे थांबा नसल्याने अडचण भासत आहे. तथापि, देवदर्शनासाठी देशभरातून येणाºया भाविकांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांनी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार स्वत: श्रमदान करून कच्चा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पॉट निरीक्षण करून समाधान व्यक्त केले होते. त्यानुसार रिद्धपूर येथे रेल्वे थांबा देण्यात येऊन रेल्वे गाडी थांबविण्याची मागणी झाली. परंतु, रेल्वे प्रशासनाच्यावतीने कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेवटी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामवासियांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन शुक्रवार १४ डिसेंबर रोजी तीर्थ सेवा समितीचे वार्इंदेशकर बाबा, प्रमोददादा अमृते, तळेगावकर बाबा, प्रमोद हरणे, रिद्धपूरचे सरपंच गोपाल जामठे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर, सचिन डवके, सुरेश सवई, राजेश डरंगे, गजानन पोहोकार, पाचराऊत बाबा, विश्वनाथ बाबा, डोळसकर बाबा, राहुल दादा, दयालमुनी बाबा, महेकराज बाबा, सायराज बाबा, वामनराव चरपे, रामभाऊ श्रीराव, महेश मुंदडा व गावातील नागरिक यांच्या नेतृत्वात श्रीमद् भगवतगीता शांतीपाठ गायन करून रेल्वे रोको आंदोलन करत असताना नागपूर येथील वाणिज्य प्रबंधक वानखडे यांनी सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून सांगितले की, सीसीएम मोठ्या अधिकाºयांची या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे रेल्वे प्लॅटफार्म तयार करण्याकरिता सीसीएम या रेल्वे अधिकाºयांची प्रस्तावावर स्वाक्षरी करून दिल्लीला पाठविण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे लवकरच रेल्वे प्लॅटफार्म तयार होऊन रेल्वे थांबासुद्धा देण्यात येणार आहे, असे नागपूर येथून आलेले वाणिज्य प्रबंधक वानखडे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले असता, आंदोलनकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये गावातील नागरिकांनी व महंतांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.