शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्या ‘हाऊसफुल्ल’

By admin | Updated: February 28, 2017 00:16 IST

जेमतेम लग्नसराई, परीक्षांना प्रारंभ झाला आहे. शाळा, महाविद्यालयांच्या सुट्यांमध्ये मौजमस्ती, नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन ....

मुंबईसाठी आरक्षण मिळेना : लग्नसराईची धूम, उन्हाळ्यात सुटीचे नियोजनअमरावती : जेमतेम लग्नसराई, परीक्षांना प्रारंभ झाला आहे. शाळा, महाविद्यालयांच्या सुट्यांमध्ये मौजमस्ती, नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन अनेकांनी चालविले आहे. त्यामुळे मार्च ते जून हे चार महिने रेल्वे गाड्यांमध्ये नो-आरक्षण असे फलक आतापासून झळकू लागले आहेत. मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असे चित्र आहे.प्रवाशांचा रेल्वे गाड्यांत सुकर प्रवास व्हावा, यासाठी यंदा हॉलीडे स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र 'मुंबईकडे ये-जा करण्यासाठी जूनपर्यंत गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल' असे फलक झळक त आहेत. तसेच दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, पुणे, हावडा मार्गे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण होणार आहे. शनिवारी २५ फेब्रुवारीपासून काही हॉलीडे स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात नागपूर - मडगाव, नागपूर- कुर्ला, मुंबई- नागपूर, नागपूर- पुणे, मुंबई - नागपूर अशा आठ फेऱ्या शनिवार, रविवार व शुक्रवार या तीन दिवशी सुरू करण्यात आल्या आहेत. मार्च महिना प्रारंभ होताच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी एकच झुंबड उडते. विशेषत: मुंबई, पुणेकडे ये-जा करताना शाळा, महाविद्यालयांना लागणाऱ्या सुट्यानुसार रेल्वे गाड्यांचे आरक्षण केले जाते. मात्र पुढील तीन महिने रेल्वेचे आरक्षण मिळविण्यासाठी प्रवाशांना आतापासून रस्सीखेच करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच तिरुपती देवस्थानात दर्शनासाठीसुद्धा रेल्वेने ये - जा करणे भाविक पसंती देतात. मात्र उन्हाळ्यात तीन महिने अमरावती- तिरुपती, अहमदाबाद- चैन्नई एक्सप्रेसमध्ये आरक्षणाची मागणी वाढू लागली आहे. नागपूर- पुणे गरीब रथ, अमरावती- मुंबई एक्सप्रेस या गाड्यांना प्रवाशांची सर्वांधिक पसंती असून जूनपर्यंत आरक्षण नाही, अशी आॅनलाईन माहिती मिळत आहे. पुणे, मुंबईकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यामार्गे ये - जा करणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांची मागणी जास्त आहे. रेल्वे गाड्यात ‘नो - आरक्षण’ हे झळकत असलेले तिकीट खिडक्यांवरील फलक प्रवाशांसाठी येत्या तीन महिन्यांत डोकेदुखी ठरणारे आहे. (प्रतिनिधी)पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षणाची स्थिती कठीण दिसत आहे. मुंबईसाठी तीन महिने आरक्षण हाऊसफुल्ल आहे. हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू झाल्या असून काही अंशी प्रवाशांचा ताण दूर होईल.- डी. व्ही. धकाते,मुख्य आरक्षण पर्यवेक्षक, अमरावती रेल्वे स्थानक