शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

रेल्वेची ट्रॅक सुरक्षा मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:47 IST

रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.

ठळक मुद्देअपघात रोखण्यासाठी उपाययोजना : मध्य रेल्वे भुसावळ विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.गेल्या काही वर्षांत रेल्वे गाड्यांच्या अपघातांनी प्रवाशांचे नाहक जीव गमवावे लागल्याने रेल्वे मंत्रालय टिकेची धनी ठरले. मात्र, रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाच वर्षांच्या तुलनेत गत एका वर्षांत रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ ला कालावधीत केवळ ४० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी बघता रेल्वे सुरक्षा रूळावर येत असल्याचे मानले जात आहे. मात्र, रेल्वे गाड्यांचा अपघात होऊ नये,यासाठी रेल्वेने नव्याने ट्रॅकची बांधणी चालविली आहे. जुने रूळ बदलविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालले आहेत. काही रूळ खासगी कंपनीमार्फत यंत्राद्वारे बदलविले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जात आहे. मुख्य रेल्वे मार्गावर रूळांबाबत कोणतीही समस्या, प्रश्न असल्यास संबंधित अधिकाºयांकडून त्वरेने सोडविली जात आहे. ट्रॅकचे सुरक्षेबाबत प्रशिक्षण आणि सुरक्षा यंत्रणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गँगमनकडे विशेष मोहीम म्हणून काही स्वतंत्र चमू तयार करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी रूळांचे सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. रात्रीला गँगमनने किमान २१ किमी.पर्यंतचे पायदळ सुरक्षावारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.पुलांवरील ट्रॅक सुरक्षेवर विशेष लक्षआतापर्यंत रेल्वे गाड्यांचे अपघात हे पुलांवर सर्वांत जास्त झाले आहेत. त्यामुळे रेल्वे रूळांवरील जुने, नवीन पुलांची दुरुस्ती, डागडुजीला प्राधान्य देण्यात येत आहे. या कामाने वेग घेतला आहे. ट्रॅकच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही उणिवा असणार नाही, याची जबाबदारी वरिष्ठ विभागीय अभियंता (पीआयडब्ल्यू) या विभागाकडे सोपविण्यात आली आहे.रेल्वे रूळांच्या सुरक्षेबाबत सतत सतर्कता बाळगली जाते. गँगमनकडे विशेष जबाबदारी आहे. २१ कि.मी.पर्यंत पायी चालून गँगमन रूळांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेत आहे. काही ठिकाणी आम्ही जातो. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.- यू. पी. पटेल, वरिष्ठ विभागीय अभियंता, बडनेरा