शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

रेल्वेची ट्रॅक सुरक्षा मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:47 IST

रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.

ठळक मुद्देअपघात रोखण्यासाठी उपाययोजना : मध्य रेल्वे भुसावळ विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.गेल्या काही वर्षांत रेल्वे गाड्यांच्या अपघातांनी प्रवाशांचे नाहक जीव गमवावे लागल्याने रेल्वे मंत्रालय टिकेची धनी ठरले. मात्र, रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाच वर्षांच्या तुलनेत गत एका वर्षांत रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ ला कालावधीत केवळ ४० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी बघता रेल्वे सुरक्षा रूळावर येत असल्याचे मानले जात आहे. मात्र, रेल्वे गाड्यांचा अपघात होऊ नये,यासाठी रेल्वेने नव्याने ट्रॅकची बांधणी चालविली आहे. जुने रूळ बदलविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालले आहेत. काही रूळ खासगी कंपनीमार्फत यंत्राद्वारे बदलविले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जात आहे. मुख्य रेल्वे मार्गावर रूळांबाबत कोणतीही समस्या, प्रश्न असल्यास संबंधित अधिकाºयांकडून त्वरेने सोडविली जात आहे. ट्रॅकचे सुरक्षेबाबत प्रशिक्षण आणि सुरक्षा यंत्रणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गँगमनकडे विशेष मोहीम म्हणून काही स्वतंत्र चमू तयार करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी रूळांचे सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. रात्रीला गँगमनने किमान २१ किमी.पर्यंतचे पायदळ सुरक्षावारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.पुलांवरील ट्रॅक सुरक्षेवर विशेष लक्षआतापर्यंत रेल्वे गाड्यांचे अपघात हे पुलांवर सर्वांत जास्त झाले आहेत. त्यामुळे रेल्वे रूळांवरील जुने, नवीन पुलांची दुरुस्ती, डागडुजीला प्राधान्य देण्यात येत आहे. या कामाने वेग घेतला आहे. ट्रॅकच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही उणिवा असणार नाही, याची जबाबदारी वरिष्ठ विभागीय अभियंता (पीआयडब्ल्यू) या विभागाकडे सोपविण्यात आली आहे.रेल्वे रूळांच्या सुरक्षेबाबत सतत सतर्कता बाळगली जाते. गँगमनकडे विशेष जबाबदारी आहे. २१ कि.मी.पर्यंत पायी चालून गँगमन रूळांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेत आहे. काही ठिकाणी आम्ही जातो. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.- यू. पी. पटेल, वरिष्ठ विभागीय अभियंता, बडनेरा