शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
4
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
5
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
6
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
7
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
8
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
11
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
12
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
13
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
14
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
15
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
16
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
17
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
18
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
19
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!

रेल्वेची ट्रॅक सुरक्षा मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:47 IST

रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.

ठळक मुद्देअपघात रोखण्यासाठी उपाययोजना : मध्य रेल्वे भुसावळ विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.गेल्या काही वर्षांत रेल्वे गाड्यांच्या अपघातांनी प्रवाशांचे नाहक जीव गमवावे लागल्याने रेल्वे मंत्रालय टिकेची धनी ठरले. मात्र, रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाच वर्षांच्या तुलनेत गत एका वर्षांत रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ ला कालावधीत केवळ ४० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी बघता रेल्वे सुरक्षा रूळावर येत असल्याचे मानले जात आहे. मात्र, रेल्वे गाड्यांचा अपघात होऊ नये,यासाठी रेल्वेने नव्याने ट्रॅकची बांधणी चालविली आहे. जुने रूळ बदलविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालले आहेत. काही रूळ खासगी कंपनीमार्फत यंत्राद्वारे बदलविले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जात आहे. मुख्य रेल्वे मार्गावर रूळांबाबत कोणतीही समस्या, प्रश्न असल्यास संबंधित अधिकाºयांकडून त्वरेने सोडविली जात आहे. ट्रॅकचे सुरक्षेबाबत प्रशिक्षण आणि सुरक्षा यंत्रणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गँगमनकडे विशेष मोहीम म्हणून काही स्वतंत्र चमू तयार करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी रूळांचे सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. रात्रीला गँगमनने किमान २१ किमी.पर्यंतचे पायदळ सुरक्षावारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.पुलांवरील ट्रॅक सुरक्षेवर विशेष लक्षआतापर्यंत रेल्वे गाड्यांचे अपघात हे पुलांवर सर्वांत जास्त झाले आहेत. त्यामुळे रेल्वे रूळांवरील जुने, नवीन पुलांची दुरुस्ती, डागडुजीला प्राधान्य देण्यात येत आहे. या कामाने वेग घेतला आहे. ट्रॅकच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही उणिवा असणार नाही, याची जबाबदारी वरिष्ठ विभागीय अभियंता (पीआयडब्ल्यू) या विभागाकडे सोपविण्यात आली आहे.रेल्वे रूळांच्या सुरक्षेबाबत सतत सतर्कता बाळगली जाते. गँगमनकडे विशेष जबाबदारी आहे. २१ कि.मी.पर्यंत पायी चालून गँगमन रूळांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेत आहे. काही ठिकाणी आम्ही जातो. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.- यू. पी. पटेल, वरिष्ठ विभागीय अभियंता, बडनेरा